आंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या

| Updated on: Sep 30, 2020 | 5:06 PM

देशात आंध्रप्रदेश आणि तेलंगाणासारखा दिशा कायदा लागू करावा, अशी मागणी नवनीत कौर राणा यांनी केली आहे. (Navneet Rana on Hathras Uttar Pradesh Gang raped Case)

आंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या
Follow us on

अमरावती : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील बलात्काराच्या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण देशात आंध्रप्रदेश आणि तेलंगाणासारखा दिशा कायदा लागू करावा, अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी केली आहे. (Navneet Rana on Hathras Uttar Pradesh Gang raped Case)

“खासदार नवनीत राणा या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे मुली किंवा महिलांवर अत्याचार करणाऱ्याला तात्काळ फासावर लटकवून दिलं पाहिजे. या नराधमांविरुद्ध तक्रार दाखल करताच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

“देशात अशाप्रकारे अत्याचाराचे कृत्य करणाऱ्या नराधमांना पुढील आठ ते दहा वर्षे जगू शकतात, आमच्यावर कडक कारवाई होत नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात जो किडा आहे तो असाच राहणार आहे. जोपर्यंत आपल्या देशातील कायद्यात बदल होत नाहीत तोपर्यंत हे सतत घडत राहणार आहे,” असे नवनीत राणा म्हणाल्या.

“देशातील केंद्र सरकारने अन्यथा प्रत्येक राज्यात, ज्याप्रमाणे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांनी दिशा कायद्याची तरतूद केली आहे. जे कोणी असे कृत्य करेल, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे हा कायदा सांगतो. त्यानुसार प्रत्येक राज्याने हा कायदा अमलात आणायला हवा,” असे नवनीत राणा यांनी सांगितले.

“काही महिन्यांपूर्वी वर्ध्यातही अशाचप्रकारची घटना घडली होती. तेव्हाही आम्ही गृहमंत्र्यांनी विनंती केली होती, ज्याप्रमाणे आंध्रप्रदेशातील सरकारने दिशा कायद्यामार्फत तरतूद आणली आहे. तसेच आपल्या राज्यातही बदल केला पाहिजे. देशानेही सर्व राज्यात हे लागू करायला हवं. त्यामुळे आपल्या देशात अशाप्रकारे कृत्य करणारे नराधम यापासून दूर राहतील आणि या घटना कमी होतील,” असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. (Navneet Rana on Hathras Uttar Pradesh Gang raped Case)

संबंधित बातम्या : 

UP GANGRAPE CASE | स्मृती इराणी गप्प का? नेटकऱ्यांची इराणींवर टीकेची झोड, राजीनामा देण्याची मागणी

नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा