AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दिवसाचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले….

"आमच्या शुभेच्छा आहेत की आपण नक्की मुख्यमंत्री बनावेत आणि पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा. पण परिस्थिती अशी आली की तुम्हाला मुख्यमंत्री बनावं लागलं पण ते फक्त एक दिवसाचं, त्या एक दिवसात तुम्ही काय कराल?", असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली.

एका दिवसाचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले....
| Updated on: Apr 26, 2023 | 9:19 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. ‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात ही मुलाखत आयोजित करण्यात आली. अतिशय दिलखुलास अशी ही मुलाखत पार पडली. या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना एक दिवसांचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल, कोणती गोष्टी आधी कराल? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

अमृता फडणवीस : राज तुमच्या जीवनात राजकीय आशांपेक्षा सामाजिक आशय दिसून येतो. तुमच्या भाषण, वेगवेगळे आंदोलनात ते दिसून येतं. तुमची आंदोलनं यशस्वी झाली. आमच्या शुभेच्छा आहेत की आपण नक्की मुख्यमंत्री बनावेत आणि पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा. पण परिस्थिती अशी आली की तुम्हाला मुख्यमंत्री बनावं लागलं पण ते फक्त एक दिवसाचं, त्या एक दिवसात तुम्ही काय कराल? तुम्ही एकदा म्हणाला होता की, एकदा सत्ता हातात द्या, सुतासारखं सगळ्यांना करेन. काय कराल?

राज ठाकरे : एका दिवसात काय करु? एका दिवसात काय होतं?

अमृता फडणवीस : तरीही?

राज ठाकरे : एका दिवसात काय होतं? तुम्ही पाच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देत होता, आता एका दिवसावर कुठे आलात?

अमृता फडणवीस : नाही तुम्हाला सहा महिने दिले तर तुम्ही लगेच काय बदलाव आणाल?

राज ठाकरे : असं आता मला सहा महिने, एक दिवस, पाच दिवस असं सांगता येणार नाही. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत त्या सहज बदलू शकतो. कायदे आहेत. कायदा आहे पण ऑर्डर नाही. मला वाटतं कायदे आहेत. पण त्याची अंमलबजावणी होत नाही. मला असं वाटतं ऑर्डरची गरज आहे. त्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. तुम्ही त्यांच्या हातामध्ये 48 तास द्या. त्यांना सांगा, मला महाराष्ट्र साफ करुन द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. पण त्यांना ऑर्डर नसतं. रिस्क कोण घेईल? पोलिसांनी एखादी भूमिका घेतल्यावर जेलमध्ये जावं लागत असेल तर ते जेलमध्ये का जातील आणि कुणासाठी जातील? बसलेलाच माणूस टेम्पररी आहे. त्यासाठी ते जेलमध्ये जातील.

अमृता फडणवीस : मला वाटतं पोलीस ऑफिसरलाच एक दिवसाचा मुख्यमंत्री बनवला पाहिजे?

राज ठाकरे : आपल्याकडे उत्तम पोलीस अधिकारी आहेत. महाराष्ट्र त्याबाबतीत भाग्यवान आहे. फक्त त्या लोकांना 48 तासांसाठी मोकळा हात द्या.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.