AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी… महाराष्ट्रातील हा राजकीय पक्ष स्वबळावर लढणार, पाच उमेदवारांची घोषणा; मत विभाजनाचा फटका कुणाला?

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी हे आज छत्रपती संभाजीनगरात आले होते. यावेळी त्यांनी विधानसभा जागांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

मोठी बातमी... महाराष्ट्रातील हा राजकीय पक्ष स्वबळावर लढणार, पाच उमेदवारांची घोषणा; मत विभाजनाचा फटका कुणाला?
assuddin owaisiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2024 | 8:27 PM
Share

राज्यात विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. काही पक्षांनी महाविकास आघाडी आणि महायुतीत राहून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही पक्षांनी तिसऱ्या आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनीही कोणत्याही आघाडीत न जाता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर त्यांनी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली आहे. त्यामुळे एमआयएमचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एमआयएमचे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवैसी आज संभाजीनगरमध्ये होते. यावेळी त्यांनी आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली. पण त्यांनी नंतर काहीच कळवलं नाही. त्यामुळे आम्ही अधिक वाट न पाहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असं असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितलं.

पाच उमेदवारांची नावे जाहीर

असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. संभाजीनगरमधून इम्तियाज जलील, धुळ्यातून फारूक शाह, मालेगावमधून मुफ्ती इस्माईल, मुंबईतून रईस लष्करीया, सोलापूरमधून फारूक शाब्दी निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. इतर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे नंतर जाहीर केली जाणार आहेत, असंही ओवैसी यांनी सांगितलं.

आघाडीला फटका बसणार?

एमआयएमने सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. आम्हाला आघाडीत घ्या म्हणून आघाडीला वारंवार विनंतीही केली. पण आघाडीने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एमआयएमने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी साथ दिली होती. आता हा व्होटर एमआयएमकडे वळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

ती आमची संपत्ती

यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड बिलावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदी सरकारने आणलेलं हे बिल मुस्लिम विरोधी आहे. भारतातील मुस्लिमांची वक्फ संपत्ती ही खासगी संपत्ती आहे. आमच्या पूर्वजांनी दिलेली ही संपत्ती आहे. मोदी सरकारला हे सगळं संपवायचं आहे. मोदी सरकारला या विधेयकाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम संपवायचा आहे. त्याचा निषेध नोंदवला गेला पाहिजे. सरकारला आपला विरोध कळवला पाहिजे. देशात 14 ट्रिब्यूनल आहेत. त्यांचे निर्णय अंतिम मानले जातात. पण सरकार आमच्याबाबत हे ट्रिब्यूनल ठेवायला तयार नाही, असंही ते म्हणाले.

जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.
रोहित पवारांनी घेतली मृत को-पायलट शांभवी पाठक यांच्या कुटुंबाची भेट
रोहित पवारांनी घेतली मृत को-पायलट शांभवी पाठक यांच्या कुटुंबाची भेट.
मुंबईत टोकियोचा नजारा; इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चेरी ब्लॉसमचा बहर
मुंबईत टोकियोचा नजारा; इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चेरी ब्लॉसमचा बहर.
विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल
विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल.