AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भूमिका कळली नसेल तर पेग्विनने भांग घेतली होती का? सीमाप्रश्नावरून आशिष शेलारांचा पलटवार

आमचा दावा ज्या गावांवर आहे, तो 100% सर्वोच्च न्यायालयात देखील मांडला आहे, पुढे नेला आहे. त्या ठिकाणाहून जी वक्तव्य झाली त्या संदर्भात स्वतः अमित शहा देखील बोलले आहेत. तरीही अशी वक्तव्ये होत असल्याचं आशिष शेलार म्हणाले.

भूमिका कळली नसेल तर पेग्विनने भांग घेतली होती का? सीमाप्रश्नावरून आशिष शेलारांचा पलटवार
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Dec 12, 2022 | 3:20 PM
Share

मुंबईः सीमाप्रश्नी भाजपने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही असा प्रश्न विचारणाऱ्या शिवसेना आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जहरी सवाल केलाय. महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka) सीमाप्रश्नावर भाजपने पहिल्याच दिवशी भूमिका स्पष्ट केलेली आहे. तरीही ती कळली नसेल तर पेंग्विनने भांग घेतली होती का, असा प्रश्न त्यांनी विचारलाय.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगाव तसेच महाराष्ट्रातील इतर गावांबाबत सातत्याने वक्तव्य करत असताना महाराष्ट्र सरकार शांत का बसलंय? केंद्रात भाजप सरकार असूनही महाराष्ट्रातील शिंदे-भाजप महायुतीचं सरकार मूग गिळून का बसलंय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. त्याला आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं.

आशिष शेलार म्हणाले, ‘ आदित्य ठाकरे सामना सोडून काही वाचत नसतील किंवा बाकीची भाषा त्यांना कळत नसेल.. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी भूमिका स्पष्ट केली होती. कर्नाटकने हे सगळं प्रकरण शांततेने आणि संयमाने घेतलं पाहिजे. अन्यथा आरेला कारेचं उत्तर मिळेल.

आमचा दावा ज्या गावांवर आहे, तो 100% सर्वोच्च न्यायालयात देखील मांडला आहे, पुढे नेला आहे. त्या ठिकाणाहून जी वक्तव्य झाली त्या संदर्भात स्वतः अमित शहा देखील बोलले आहेत. तरीही अशी वक्तव्ये होत असल्याचं आशिष शेलार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. त्यामुळे अनिल देशमुख लवकरच जेलमधून बाहेर येण्याची शक्यता आहे. आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अनिल देशमुख यांनी केलेला गुन्हा भयंकर आहे. गृहमंत्री असताना वाजेसारखे अधिकारी यांना वापरून दर महिन्याला काहीतरी मिळाले पाहिजे शंभर कोटीपर्यंत मिळाले पाहिजेत, असा धंदा केला. त्यामुळेच ते जेलमध्ये आहेत….

न्यायालय प्रक्रियेमध्ये मी भाष्य करणार नाही. पण बाहेर आल्यावर त्यांचे परत असेच धंदे सुरू होतील की काय अशी भीती मुंबई आणि राज्याच्या नागरिकांमध्ये आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.