AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

मलिक यांनी सुरु केलेल्या आरोपांच्या मालिकेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाने नवाब मलिक यांची स्तुती केल्याची माहिती मिळतेय. याच मुद्द्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

'अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात', अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
नवाब मलिक, उद्धव ठाकरे, अतुल भातखळकर
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 3:09 PM
Share

मुंबई : आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्ला करायला सुरुवात केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मलिक यांनी ड्रग्स प्रकरणात आणि अंडरवर्ल्डशी संबंधित काही गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी सुरु केलेल्या आरोपांच्या मालिकेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाने नवाब मलिक यांची स्तुती केल्याची माहिती मिळतेय. याच मुद्द्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. (Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray and Nawab Malik)

‘गुड गोइंग! नवाब मलिक यांच्या लढ्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत बेछूट आरोप करणारे नवाब मलिक केवळ व्यवसायाने नाहीत तर मनोवृत्तीने देखील भांगारवाले आहेत. अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत’, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

गुड गोईंग.. मुख्यमंत्र्यांकडून मलिकांचं कौतुक

गेल्या काही दिवसांपासून मलिकांनी भाजपविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. आता तर मलिकांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरु केलीय. फडणवीस यांच्या आशीर्वादानेच राज्यात ड्रग्सचा बाजार सुरु झाल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी फडणवीसांवर मुन्ना यादव, रियाझ भाटी यांच्यावरुन फडणविसांवर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं ‘गुड गोईंग’ अशा शब्दात कौतुक केल्याची माहिती मिळत आहे.

संजय राऊतांचं मलिकांना आवाहन

दुसरीकडे मलिक यांनी आता थांबलं पाहिजे असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते आज दिल्लीत बोलत होते. कधी कुणाबरोबर फोटो असेल तर तो पुरावा होऊ शकत नाही. 20 वर्षापूर्वीची व्यक्ती आज वेगळी असते. गुंड पुंड भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये स्वच्छ होतो. निवडणुकीच्या राजकारणासाठी राजकारण कोणत्या थराला गेलेय? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणी तरी कर्त्या नेत्याने हस्तक्षेप केला पाहिजे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. खूप प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत. नवाब मलिक यांचे हल्ले जोरदार आहेत. एका चिडीतून ते करत आहेत. मी राज्यपालांना भेटलो. त्यांच्याशी यावरही चर्चा केली पाहिजे. समेट घडवला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या :

माजी परिवहन आयुक्तांचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला, तर कर्मचाऱ्यांच्या वाऱ्यावर सोडू नका, राज्य सरकारलाही आवाहन

अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली, प्रविण दरेकरांचा घणाघात

Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray and Nawab Malik

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.