Aurangabad | औरंगाबाद ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या गडावर शिंदे गटाचा झेंडा, 16 पैकी 12 जागांवर विजय, काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपाला भोपळा

औरंगाबादेत आर्थिक आणि औद्योगिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायतीवर एकनाथ शिंदे गटाचा विजय झाला आहे.

Aurangabad | औरंगाबाद ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या गडावर शिंदे गटाचा झेंडा, 16 पैकी 12 जागांवर विजय, काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपाला भोपळा
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 2:53 PM

औरंगाबादः शिवसेनेत उभी फूट पडल्याने औरंगाबाद ग्राम पंचायत निवडणुकीत (Aurangabad Gram Panchayat Election) उद्धव ठाकरेंच्या गटाला जोरदार फटका बसलाय. जिल्ह्यातील एकूण 16 ग्रामपंचायतींपैकी 12 जागांवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या पॅनलचा विजय झालाय. एकूण जिल्हाभराचा विचार करता भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती भोपळा लागल्याचं चित्र आहे. शिवसेनेतून (Shivsena Rebel) एकनाथ शिंदे गटाने फारकत घेतल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणूक होती. बंडखोर आमदारांवर जनता नाराज असल्याचंही बोललं जात होतं. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक रहिवाशांनी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने कौल दिल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वात मोठी वडगाव-कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीवर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं पॅनल विजयी झालंय. ही ग्रामपंचायतदेखील शिंदे गटाकडे आली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.

16 पैकी 12 ग्रामपंचायती शिंदे गटाकडे

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 12 ठिकाणी एकाथ शिंदे पुरस्कृत पॅनल मोठ्या फरकाने विजयी ठरले आहे. औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी वडगाव-कोल्हाटी बजाजनगर ही ग्रामपंचायतही आमदर शिरसाट यांच्या ताब्यात आली आहे. जिल्ह्यातील फक्त 2 ग्रामपंचायतींवर मूळ शिवसेनेच्या पॅनलचा विजय झाला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या हाती एकही ग्रामपंचायत लागेलेली नाही.

जिल्हा- औरंगाबाद

  • एकूण ग्रामपंचायत- 16
  • शिवसेना – 2
  • शिंदे गट- 12
  • भाजप- 0
  • राष्ट्रवादी- 0
  • राष्ट्रवादी- 0
  • काँग्रेस-0
  • इतर- 2

सिल्लोडमध्ये सत्तारांकडे 2 ग्रामपंचायती

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातही शिंदे गटाने विजयी झेंडा फडकवला आहे. येथील तीन पैकी 2 ग्रामपंचायतवर शिंदे गट विजयी झाला आहे. नानेगाव आणि जंजाळ या दोन ग्रामपंचायत अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आल्या आहेत.

पैठणमध्ये संदिपान भुमरेंचा विजय

पैठण तालुक्यातील सात पैकी 6 ग्रामपंचायतींवर एकनाथ शिंदे गटाचा विजय झाला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी येथील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोरदार प्रचार केला होता. तालुक्यातील आपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावतांडा या ग्रामपंचायतींवर भुमरे पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे.

प्रतिष्ठेच्या वडगाव कोल्हाटीत काय स्थिती?

औरंगाबादेत आर्थिक आणि औद्योगिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायतीवर एकनाथ शिंदे गटाचा विजय झाला आहे. गेल्या दीड दशकापासून शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत होती. शिरसाट यांनी बंड केल्यानंतर ग्रामीण भागातील जनता कुणाला कौल देते, याकडे सर्वांचं लक्ष होतं. मूळ शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनीदेखील येथे प्रचारासाठी जोर लावला होता. मात्र शिरसाट यांच्या पॅनलचाच येथे विजय झाला.  येथील 1 6 पैकी 11 जागा जिंकत शिंदे गटानं बहुमत मिळवलं.  चार जागा शिवसेनेकडे तर 2 जागांवर भाजपचा विजय झाला.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.