AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Azadi ka Amrit Mahotsav : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतो, दीपक केसरकरांचं पवारांना उत्तर

बच्चू कडू हे आमचे ज्येष्ठ सहकर्मी आहेत, आणि आम्हाला मर्यादा होती, शिवसेनेकडे किती मंत्री आहेत, मंत्रिपद देणे गरजेचे होते, मी मागे असेन, असे भरत गोगावले म्हणाले होते पण दीपक केसरकर यांना मंत्रीपद द्यावे

Azadi ka Amrit Mahotsav : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतो, दीपक केसरकरांचं पवारांना उत्तर
अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला दीपक केसरकरांची हजेरी, शरद पवारांना सल्ला Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 8:23 PM
Share

मुंबई : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था अध्यक्ष रणजित चव्हाण यांचा “अमृत महोत्सव” (Azadi ka Amrit Mahotsav) सोहळा या कार्यक्रम मध्ये कॅबिनेट मंत्री दिपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) काल हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी जेव्हा आपण एखाद्या संस्थेसाठी काम करतो, महापालिका कशी चालवायची, हे रणजित चव्हाण (Ranjeet Chavan) यांच्याकडून शिकायला हवे, मी स्वतः स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केले आहे रणजित चव्हाण यांचं कौतुक केलं. खातेवाटपाबाबत मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार असून, लवकरच खाते वाटपाचे काम उघड होणार आहे, आधी कोणाचे खाते होते, आता खाते कोणाला मिळणार किंवा प्रसारमाध्यमांमध्ये काय सुरू आहे. एक मार्ग, आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे खाते वाटपाचे काम झाले नाही, आज अनेक महत्त्वाचे निर्णयावर बैठक झाली अशी माहिती दिपक केसरकर यांनी माध्यमांना दिली.

शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी लक्ष द्यायला हवं

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी लक्ष द्यायला हवे जर आपण मित्र पक्ष आणि मोठ्या पक्षासोबत काम करत असाल तर त्यांना सांभाळणे आपले काम आहे. प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतो. राष्ट्रवादी वाढवताना पवार साहेब तुम्ही किती कष्ट केले ते कळेल, त्यावेळी त्यांना अनेक पक्ष फोडावे लागले असते. पण हा राजकारणाचा भाग आहे.

याआधीही सत्तापरिवर्तन झाले होते

आज तुम्ही बिहारमध्ये सत्ताबदल पाहिला आहे, याआधीही सत्तापरिवर्तन झाले होते. पण त्यावेळी ते भाजपसोबत आले तेव्हा काय झाले, याचा अर्थ भाजप इथे जी ट्रीटमेंट मिळायची त्यापेक्षा वेगळी ट्रीटमेंट इथे मिळते. या कारणासाठी भाजप सोडून गेला, राजकारणात असे घडते की अनुभव आल्यावर निर्णय घेतला जातो.

बच्चू कडू हे आमचे ज्येष्ठ सहकर्मी आहेत

बच्चू कडू हे आमचे ज्येष्ठ सहकर्मी आहेत, आणि आम्हाला मर्यादा होती, शिवसेनेकडे किती मंत्री आहेत, मंत्रिपद देणे गरजेचे होते, मी मागे असेन, असे भरत गोगावले म्हणाले होते पण दीपक केसरकर यांना मंत्रीपद द्यावे, कारण पक्षाची बाजू त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. आम्ही दोघेही कोकणचे आहोत, त्यांनी दाखवलेले मोठे मन, काही काळ दाखवण्यासाठी वाचतो. आणि मला खात्री आहे की आधीच्या सरकारमध्ये भरत गोगावले हे राज्यमंत्री होते. त्यापेक्षा वरचे पद मुख्यमंत्र्यांच्या मनात असेल. कोणत्याही परिस्थितीत कोणीही रागावू नये. आम्ही लवकरच भेटणार आहोत, येत्या मंत्रिमंडळ विस्तारात योग्य सन्मान होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.