AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपनं ज्येष्ठ नेत्यांना कोपऱ्यात बसवलं, मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणीचं काय झालं? ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट जे पी नड्डांना सवाल

रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी टीका केली. भास्कर जाधव म्हणाले, भाजपच्या नेत्यांमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा सुरु आहे.

भाजपनं ज्येष्ठ नेत्यांना कोपऱ्यात बसवलं, मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणीचं काय झालं? ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट जे पी नड्डांना सवाल
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 04, 2023 | 9:17 AM
Share

रत्नागिरीः तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नेत्यांना कोपऱ्यात बसवून ठेवलं. लालकृष्ण आडवाणींचं (Lalkrishna Adwani ) तेच केलं. मनोहर जोशी कुठे आहेत, हेही कुणाला माहिती नाही. पण आम्ही आमच्या बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) विसरणार नाहीत, अशी परखड टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या काळात विविध सणांवर निर्बंध घातले गेले. मात्र शिंदे-भाजप सरकारमध्ये जनतेला सगळेच सण उत्सव उत्साहाने साजरे करता आले, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं होतं. त्यावर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलंय.

रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी टीका केली. भास्कर जाधव म्हणाले, भाजपच्या नेत्यांमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा सुरु आहे.

ठाकरे सरकारच्या काळात सणांवर निर्बंध घातले ते केंद्र सरकारच्या नियमानुसारच होते. याचा भाजप नेत्यांना विसर पडलेला दिसतोय.

कोरोनाच्या निर्बंधांमध्ये ईदचा सण पार पडला आणि दहीहंडीच्या सणाला निर्बंध उठले. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते.

दहीहंडीला मोकळीक मिळते आणि आयपीएलला बंदी होते, हे बोलणारे जे पी नड्डा खोटे आरोप करण्याच्या नादात खोटे बोलून जातात, हे महाराष्ट्राला दिसलं, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे हे आमचे सर्वस्व आहेत. आम्ही त्यांना विसरावे, अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे, कारण भाजपला मोठं करणाऱ्या सर्व वरिष्ठ नेत्यांना भाजप विचारत नाही, अशी टीका जाधव यांनी केली.

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नाव तुम्ही विसरला आहात. ज्या लालकृष्ण आडवाणींनी संपूर्ण देशात रथयात्रा काढली, जेल भोगलं, त्यांना तुम्ही एका कोपऱ्यात बसवून ठेवलंय.

मुरली मनोहर जोशींच्या नेतृत्वात विद्यमान पंतप्रधान काश्मीरमध्ये रॅली घेऊन गेले. आज ते मुरली मनोहर जोशी कुठे आहेत, तेसुद्धा कुणाला माहिती नाही….

तुम्ही तुमच्या नेत्यांना विसरला तसं आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना विसरावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची नीतिमत्ता तुमच्याजवळ, आमचाही निश्चय ठाम आहे, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक