AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस पुन्हा सत्ता मिळवण्याचा मार्ग पावसाळी अधिवेशनातून तयार करणार?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार या अधिवेशनात काय नाविन्यपूर्ण भूमिका घेऊ शकतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवर राज्य सरकारकडून अनेक निर्णय अपेक्षित आहेत.

फडणवीस पुन्हा सत्ता मिळवण्याचा मार्ग पावसाळी अधिवेशनातून तयार करणार?
| Edited By: | Updated on: Jun 06, 2019 | 9:51 PM
Share

मुंबई : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून सुरु होत आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील हे शेवटचं अधिवेशन असेल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार या अधिवेशनात काय नाविन्यपूर्ण भूमिका घेऊ शकतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवर राज्य सरकारकडून अनेक निर्णय अपेक्षित आहेत.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव केल्याने सत्ताधारी शिवसेना-भाजप युती सध्या निश्चिंत दिसत आहे. मात्र राज्याची आगामी विधानसभा निवडणूक सहजासहजी न घेता राज्यात पुन्हा युतीचं सरकार आणायचं यासाठी मास्टर प्लॅन देखील तयार करण्यात आले आहेत. त्याचाच भाग म्हणून या अधिवेशनात महत्वाचे निर्णय आणि घोषणांचा पाऊस पाडला जाऊ शकतो.

फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकांना गंभीरपणे घेतलंय. तितकंच गांभीर्याने राज्यातील समस्यांना घ्यावं, अशी मागणी विरोधकांकडून अधिवेशनाच्या निमित्ताने केली जात आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून लोकांनी मत दिलं, पण विधानसभेला चित्र वेगळं असेल, असा विरोधकांना विश्वास आहे.

सत्ताधाऱ्यांनी आपल्या राजकीय खेळी अंतर्गत विधानसभा अधिवेशनात महत्वाचे लोकाभिमुख निर्णय घेतले तर याचा फायदा निश्चित त्यांना होणार आहे. मात्र केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यात येत असतील आणि त्यावर अंमलबजावणी होणार नसेल तर राज्य सरकारच्या या निर्णयाला महत्व राहणार नाही. त्यामुळे घोषणा आणि त्यानंतर तातडीने अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे.

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.