AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी आणि काँग्रेसलाही पर्याय उभा राहतोय? विरोधकांची नावं गडद होतायत, 5 घडमोडी महत्त्वाच्या!

भाजपाने मिशन 2024 साठी बड्या नेत्यांचे दौरे सुरु केले असतानाच नितीश आणि केजरीवाल यांच्या भेटीला मोठे अर्थ असल्याचं म्हटलं जातंय.

मोदी आणि काँग्रेसलाही पर्याय उभा राहतोय? विरोधकांची नावं गडद होतायत, 5 घडमोडी महत्त्वाच्या!
नितीश कुमार-अरविंद केजरीवाल भेटImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 4:27 PM
Share

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक 2024 साठी एकिकडे भाजपने (BJP) अख्खा भारत पिंजून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.  एक-एक मोहरे गळून पडलेली काँग्रेस हळू हळू उभं राहण्याची तयारी करतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (Narendra Modi) तगडा चेहरा देण्यासाठी चाचपडतेय. तर दुसरीकडे इतर पक्षांनी आपापल्या पातळीवर विरोधकांची नावं अधोरेखित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आज दिल्लीत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांनी भेट घेतली. यानंतर ते ओमप्रकाश चौटालांसह इतर विरोधी नेत्यांच्याही भेटी गाठी घेत आहेत. त्यामुळे ही मोटबांधणी मोदी आणि काँग्रेसला शह देणारी ठरतेय की काय, अशी चर्चा राजकीय गोटात सुरु आहे. या अनुशंगाने राष्ट्रीय पातळीवरील 5 मुद्दे महत्त्वाचे आहेत-

नितीश कुमार- अरविंद केजरीवाल भेट

बिहारमधील जदयू नेते, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे आम आदमी पार्टीचे नेते, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज भेट झाली. भाजपाने मिशन 2024 साठी बड्या नेत्यांचे दौरे सुरु केले असतानाच नितीश आणि केजरीवाल यांच्या भेटीला मोठे अर्थ असल्याचं म्हटलं जातंय.

नितीश-केजरीवाल मैत्री

नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांचे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत. केजरीवाल यांनी कधीही नितीश कुमारांवर टीका केलेली नाही. नितीश कुमारांनी आधी एनडीएसोबत सरकार स्थापन केले. नंतर लालूंच्या राजदसोबत गेले. तरीही केजरीवालांनी विरोधी वक्तव्य केलेले नाही. आता नितीश कुमारांच्या दिल्लीभेटीनंतर दोन नेत्यांमधील संबंध अधिक सुधारतील, अशी चर्चा आहे.

आप पाय पसरतोय…

अरविंद केजरीवाल यांनी आधी दिल्लीची सत्ता मिळवल्यानंतर पंजाबमध्येही आपचं सरकार स्थापन केलंय. दिल्लीत अरविंद केजरीवालांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात राबवलेल्या निर्णयांचं अनेकांकडून स्वागत होतंय. इतर ठिकाणीही इथल्या शिक्षणातील मॉडेलचे दाखले दिले जातायत. आता गुजरात निवडणुकांसाठीही आपने कंबर कसली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हेदेखील विरोधकांमधील महत्त्वाचे नेते म्हणून अधोरेखित होत आहेत.

नितीश-सीताराम येच्युरी भेट

नितीश कुमारांनी दिल्लीत सीपीआय (एम) कार्यालयात सीताराम येच्युरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले, ” आपण सोबत आहोत, म्हणूनच मी येथे आलोय… तर सीताराम येच्युरी म्हणाले, संपूर्ण देशातले डावे पक्ष एकत्र आले तर खूप मोठ्या घडामोडी घडतील. संविधान मानत असलेल्यांनी एकत्र येऊन विरोधकांची मोट बांधावी लागेल…

केजरीवाल काँग्रेस एकत्र येणार?

अरविंद केजरीवाल आणि नितीश कुमार यांचे संबंध चांगले आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये काँग्रेसला विरोध करत आपने सरकार आणले. काँग्रेसलाच एक पर्याय म्हणजे आप, असे अरविंद केजरीवालांना ठसवायचं आहे. पण बिहारमध्ये तर नितीश कुमारांनी राजद आणि काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांची मोट बांधायची वेळ आल्यास केजरीवाल काँग्रेस एकत्र येणार का, हा मोठा प्रश्न आहे.

बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?.