AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’च्या यशाने का खुश नाही आमिर खान? ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला जाणवली याची कमतरता

चीनच्या तुलनेत आपल्या देशात दहा पटींनी थिएटर स्क्रीन्स कमी असल्याचं आमिर खान म्हणाला. यावेळी त्याने आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाचं उदाहरण दिलं. तो म्हणाला, "हा चित्रपट जर 15000 थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असता तर.."

'धुरंधर'च्या यशाने का खुश नाही आमिर खान? 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ला जाणवली याची कमतरता
धुरंधरबद्दल काय म्हणाला आमिर खान?Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 08, 2026 | 3:54 PM
Share

रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. ओटीटीवर स्ट्रीम होऊनही या चित्रपटाची कमाई जगभरात 1300 कोटींच्या पार गेली आहे. पण जर का हा चित्रपट 15000 थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असता तर याहून कित्येक पटींनी अधिक कमाई झाली असली, असं मत अभिनेता आमिर खानने नोंदवलं आहे. चीनला मात देण्यासाठी भारतात आणखी थिएटर्सची गरज असून भारतातील काही भागांमध्ये सिंगल स्क्रीनसुद्धा उपलब्ध नसल्याची खंत आमिरने यावेळी व्यक्त केली. एखादा चित्रपट फार न चालण्यामागे या गोष्टी जबाबदार असल्याचं त्याने म्हटलंय.

‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आमिरने सांगितलं की भारतात आणखी थिएटर्सची खूप गरज आहे. सध्यस्थितीला देशात फक्त 9000 स्क्रीन्स आहेत. तर चीनमध्ये याची संख्या लाखोंमध्ये आहे. “त्यांच्या तुलनेत आपल्या देशात 10 पटींनी कमी स्क्रीन्स आहेत. म्हणूनच जेव्हा एखादा मोठा चित्रपट जेव्हा चीनमध्ये प्रदर्शित केला जातो, तेव्हा तिथे जवळपास दोन अब्ज डॉलर्सची कमाई होते. असं फक्त तिथेच घडतं. दुसऱ्या कुठल्याच देशात नाही. फक्त चीनमध्येच चित्रपट अधिक कमाई करतात. तिथे प्रदर्शित झालेला चित्रपट अब्जावधी डॉलर्सची कमाई करतो. मी युएस डॉलर्सबद्दल बोलतोय. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या स्क्रीन्सची संख्या वाढवू, तेव्हा तुम्हाला फरक दिसून येईल”, असं आमिर म्हणाला.

यावेळी आमिरने ‘धुरंधर’ या चित्रपटाचं उदाहरण दिलं. तो पुढे म्हणाला, “चला धुरंधरचं उदाहरण पाहुयात. या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तुम्हीच विचार करा, जर हा चित्रपट 5000 स्क्रीन्सऐवजी 15000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला असला, तर काय झालं असतं? कमाईचा आकडा आणखी जास्त असता. मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की खरा बदल तेव्हाच घडून येईल, जेव्हा स्क्रीन्सची संख्या वाढेल. कारण आपल्या देशात असे बरेच जिल्हे आहेत, जिथे सिंगल स्क्रीनसुद्धा नाही.”

गेल्या दहा वर्षांत चीनमध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

चित्रपट चीनमधील कमाई जगभरातील कमाई चीनमधील प्रदर्शनाची तारीख
दंगल 1305.29 कोटी रुपये 20270.30 कोटी रुपये  5 मे 2017
सिक्रेट सुपरस्टार 757.10 कोटी रुपये 912.75 कोटी रुपये 19 जानेवारी 2018
अंधाधुन 333.62 कोटी रुपये 442.72 कोटी रुपये 3 एप्रिल 2019
बजरंगी भाईजान 295.76 कोटी रुपये 921.93 कोटी रुपये 2 मार्च 2018
हिंदी मिडियम 219.17 कोटी रुपये 334.06 कोटी रुपये 7 एप्रिल 2018
हिचकी 156.66 कोटी रुपये 236.48 कोटी रुपये 12 ऑक्टोबर 2018
पीके 128.58 कोटी रुपये 792 कोटी रुपये 22 मे 2015
मॉम 110.04 कोटी रुपये 175.05 कोटी रुपये 10 मे 2019
टॉयलेट- एक प्रेम कथा 100.39 कोटी रुपये 316.97 कोटी रुपये 8 जून 2018
महाराजा 91.65 कोटी रुपये 199.20 कोटी रुपये 29 नोव्हेंबर 2024

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे भारतात चार कोटी तिकिटं विकली गेली आहेत.

बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?.