AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांशी वाद घालण्याची ही वेळ आहे का?; फडणवीस संतापले

तुमचे राज्यपालांशी मतभेद सुरुच राहतील. पण आता ती वेळ आहे का? असा सवाल फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला.

राज्यपालांशी वाद घालण्याची ही वेळ आहे का?; फडणवीस संतापले
| Updated on: Oct 19, 2020 | 11:55 AM
Share

पुणे : “राज्यपालांचं एखादं वाक्य आणि त्यावरुन झालेला विवाद याआधीदेखील झाला आहे. पण ही काय वादाची वेळ आहे का? आधी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी ठणकावून सांगितलं. फडणवीस आज (19 ऑक्टोबर) बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतील उंडवडी गावाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

“राज्यातील शेतकरी सध्या गंभीर परिस्थितीत आहे. तुमचे राज्यपालांशी मतभेद सुरुच राहतील. यापूर्वी एकाच पक्षाचे सरकार असताना, त्याच पक्षाने राज्यपाल नियुक्त केलेले असतानादेखील राज्यपालांशी मतभेद झालेले आहेत. त्यामुळे आता तो विषय नाही. आता शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्त्वाचं आहे”, अशी भूमिका फडणवीसांनी (BJP Devendra Fadnavis) मांडली.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवरांबाबत मी बोलणार नाही. पण अशी सोयीची राजकीय भूमिका कोणीही घेऊ नका. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नकोय. तुम्ही काय करणार हे सांगा. पंचनाम्याची वाट न पाहता तात्काळ मदत करा. गुरांना चारा द्या”, असं फडणवीस म्हणाले.

“राज्यात अतिवृष्टी झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: मुख्यमंत्र्याना फोन करुन मदतीचं आश्वासन दिलं आहे. केंद्र सरकार नेहमीच मदत करतं. पण राज्याची पहिली जबाबदारी आहे. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी. मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं”, असं फडणवीसांनी सांगितलं.

‘राज्य सरकारला डिफेन्ड करणं एवढंच पवारांना काम’

“शरद पवार यांना राज्य सरकारला डिफेन्ड करावं लागत आहे. या सरकारचा इतका नाकर्तेपणा बाहेर येतोय की प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या सरकारला डिफेन्ड करणं एवढंच काम शरद पवार यांच्याकडे आहे”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“आमचा दौरा घोषित झाल्यानंतर या सरकारमधील अनेक पालकमंत्री आपल्या मतदारसंघात गेले. तोपर्यंत ते गेले नव्हते. आमचा दौरा घोषित झाल्यानंतर तात्काळ सर्वांची झोप उडाली. सगळे पटापट मुंबईहून आपापल्या मतदारसंघात गेले”, असंदेखील फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही : शरद पवार

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.