AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election : भाजपच्या तीनही उमेदवारांचे अर्ज दाखल, फडणवीस म्हणतात, “आमचे तीन रिटायर झाले, तीन येणार, निर्णय त्यांना घ्यायचाय!”

"आमचे तीन रिटायर झाले, तीन येणार, निर्णय त्यांना घ्यायचाय!", असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Rajya Sabha Election : भाजपच्या तीनही उमेदवारांचे अर्ज दाखल, फडणवीस म्हणतात, आमचे तीन रिटायर झाले, तीन येणार, निर्णय त्यांना घ्यायचाय!
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 30, 2022 | 1:09 PM
Share

मुंबई : राज्यसभेच्या (Rajyasabha Electon 2022 ) सहा जागांसाठी निवडणूक होतेय. भाजपच्या तीनही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे तीन रिटायर झाले, तीन येणार, निर्णय त्यांना घ्यायचाय!”, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

फडणवीस काय म्हणाले?

भाजपच्या तीनही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा आमचे तीनही उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. शिवाय “आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. घोडेबाजार रोखायचा असेल तर महाविकास आघाडीने आपला उमेदवार मागे घ्यावा. पण जरी त्यांनी आपला उमेदावार मागे घेतला नाही तरी आम्ही घोडेबाजार करणार नाही. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आमचे तीनही उमेदवार निवडून येतील”, असं फडणवीस म्हणालेत.

धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपकडून कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक  यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

अनिल बोंडेंचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपचे नेते, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  अनिल बोंडेकडे राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या काळात काही काळ राज्याचे कृषीमंत्री पद होते. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणारा, जमिनीवरचा नेता अशी त्यांची ओळख आहे. 2022 च्या अमरावतीच्या दंगलीत त्यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिकाही त्यांच्या साठी जमेची ठरली आहे.

पियुष गोयल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आज राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  पियूष गोयल यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?