Sanjay Raut : शिंदेंचे चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे; सुरतमध्ये बंडखोरांना कोणता मंत्र मिळाला? राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

एकनाथ शिंदे हे चाळीस बंडखोर आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र शिंदेंचे हे बंड म्हणजे भूकंप नव्हे, अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टीकून असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : शिंदेंचे चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे; सुरतमध्ये बंडखोरांना कोणता मंत्र मिळाला? राऊतांचा 'रोखठोक' सवाल
संजय राऊत Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 9:26 AM

मुंबई: पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपावर (BJP) निशाणा साधाला आहे. शिवसेनेतून 40 आमदारांनी बंड केले. हे आमदार आधी सुरतला गेले आणि तिथून पुढे त्यांना आसामला नेण्यात आले. या आमदरांचे नेतृत्त्व एकनाथ शिंदे हेच करत आहेत. मात्र या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपाचे दिग्दर्शकच असल्याची टीका संजय राऊत यांनी आपल्या सामनामधील रोखठोक या सदरात केली आहे. राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, भाजपाची महाशक्ती आपल्या पाठिशी उभी आहे, अशी कबुलीच एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हे आमदार जेव्हा सुरतला गेले तेव्हा या आमदारांच्या रक्षणासाठी भाजपाचे लोक उपस्थित होते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मग आमदारांची व्यवस्था का करतात?

भाजप म्हणते आमचा या बंडखोरीशी काहीही संबंध नाही, मग हे आमदार नेमके सुरतलाच का गेले. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. या बंडखोर आमदारांच्या सेवेत तेथील सरकारने आपली पूर्ण यंत्रणा लावली. त्यानंतर त्या आमदारांना स्पेशल विमानाने आसाममध्ये हलवण्यात आले. या आमदारांची पुढील व्यवस्था आसाम सरकारने केली. आसाममध्ये देखील भाजपाचे सरकार आहे. मग जर भाजपाचा या बंडखोरीशी काही संबंध नसेल आणि हा शिवसेनेचा अंतर्गत मामला असेल तर भाजपाचे लोक या बिऱ्हाडाची एवढी कडकोट व्यवस्था का करत आहेत. या आमदारांना पहिल्यांदा सूरतमध्येच का नेण्यात आले? तिथे त्यांना कोणता मंत्र देण्यात आला असे अनेक सवाल संजय राऊत यांनी रोखठोकमधून उपस्थित केले आहेत.

हे सुद्धा वाचा

अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकले

एकनाथ शिंदे हे चाळीस बंडखोर आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र शिंदेंचे हे बंड म्हणजे भूकंप नव्हे, अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टीकून आहे. आमदार येतात, जातात मात्र पक्ष संघटन ठाम असते. शिवसेनेतून भूजबळ फुटले, राणे फुटले हे मान्य की त्यांना एवढ्या आमदारांचे समर्थन मिळाले नाही. मात्र त्याचा परिणाम काय झाला? भूजबळांना समर्थन असून देखील त्यांचा पराभव झाला. तसेच राणे यांना देखील मोठा फटका बसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.