AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : शिंदेंचे चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे; सुरतमध्ये बंडखोरांना कोणता मंत्र मिळाला? राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

एकनाथ शिंदे हे चाळीस बंडखोर आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र शिंदेंचे हे बंड म्हणजे भूकंप नव्हे, अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टीकून असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : शिंदेंचे चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे; सुरतमध्ये बंडखोरांना कोणता मंत्र मिळाला? राऊतांचा 'रोखठोक' सवाल
संजय राऊत Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 26, 2022 | 9:26 AM
Share

मुंबई: पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपावर (BJP) निशाणा साधाला आहे. शिवसेनेतून 40 आमदारांनी बंड केले. हे आमदार आधी सुरतला गेले आणि तिथून पुढे त्यांना आसामला नेण्यात आले. या आमदरांचे नेतृत्त्व एकनाथ शिंदे हेच करत आहेत. मात्र या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपाचे दिग्दर्शकच असल्याची टीका संजय राऊत यांनी आपल्या सामनामधील रोखठोक या सदरात केली आहे. राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, भाजपाची महाशक्ती आपल्या पाठिशी उभी आहे, अशी कबुलीच एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हे आमदार जेव्हा सुरतला गेले तेव्हा या आमदारांच्या रक्षणासाठी भाजपाचे लोक उपस्थित होते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मग आमदारांची व्यवस्था का करतात?

भाजप म्हणते आमचा या बंडखोरीशी काहीही संबंध नाही, मग हे आमदार नेमके सुरतलाच का गेले. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. या बंडखोर आमदारांच्या सेवेत तेथील सरकारने आपली पूर्ण यंत्रणा लावली. त्यानंतर त्या आमदारांना स्पेशल विमानाने आसाममध्ये हलवण्यात आले. या आमदारांची पुढील व्यवस्था आसाम सरकारने केली. आसाममध्ये देखील भाजपाचे सरकार आहे. मग जर भाजपाचा या बंडखोरीशी काही संबंध नसेल आणि हा शिवसेनेचा अंतर्गत मामला असेल तर भाजपाचे लोक या बिऱ्हाडाची एवढी कडकोट व्यवस्था का करत आहेत. या आमदारांना पहिल्यांदा सूरतमध्येच का नेण्यात आले? तिथे त्यांना कोणता मंत्र देण्यात आला असे अनेक सवाल संजय राऊत यांनी रोखठोकमधून उपस्थित केले आहेत.

अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकले

एकनाथ शिंदे हे चाळीस बंडखोर आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र शिंदेंचे हे बंड म्हणजे भूकंप नव्हे, अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टीकून आहे. आमदार येतात, जातात मात्र पक्ष संघटन ठाम असते. शिवसेनेतून भूजबळ फुटले, राणे फुटले हे मान्य की त्यांना एवढ्या आमदारांचे समर्थन मिळाले नाही. मात्र त्याचा परिणाम काय झाला? भूजबळांना समर्थन असून देखील त्यांचा पराभव झाला. तसेच राणे यांना देखील मोठा फटका बसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.