AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : शिंदेंचे चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे; सुरतमध्ये बंडखोरांना कोणता मंत्र मिळाला? राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

एकनाथ शिंदे हे चाळीस बंडखोर आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र शिंदेंचे हे बंड म्हणजे भूकंप नव्हे, अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टीकून असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : शिंदेंचे चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे; सुरतमध्ये बंडखोरांना कोणता मंत्र मिळाला? राऊतांचा 'रोखठोक' सवाल
संजय राऊत Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 26, 2022 | 9:26 AM
Share

मुंबई: पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपावर (BJP) निशाणा साधाला आहे. शिवसेनेतून 40 आमदारांनी बंड केले. हे आमदार आधी सुरतला गेले आणि तिथून पुढे त्यांना आसामला नेण्यात आले. या आमदरांचे नेतृत्त्व एकनाथ शिंदे हेच करत आहेत. मात्र या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपाचे दिग्दर्शकच असल्याची टीका संजय राऊत यांनी आपल्या सामनामधील रोखठोक या सदरात केली आहे. राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, भाजपाची महाशक्ती आपल्या पाठिशी उभी आहे, अशी कबुलीच एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हे आमदार जेव्हा सुरतला गेले तेव्हा या आमदारांच्या रक्षणासाठी भाजपाचे लोक उपस्थित होते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मग आमदारांची व्यवस्था का करतात?

भाजप म्हणते आमचा या बंडखोरीशी काहीही संबंध नाही, मग हे आमदार नेमके सुरतलाच का गेले. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. या बंडखोर आमदारांच्या सेवेत तेथील सरकारने आपली पूर्ण यंत्रणा लावली. त्यानंतर त्या आमदारांना स्पेशल विमानाने आसाममध्ये हलवण्यात आले. या आमदारांची पुढील व्यवस्था आसाम सरकारने केली. आसाममध्ये देखील भाजपाचे सरकार आहे. मग जर भाजपाचा या बंडखोरीशी काही संबंध नसेल आणि हा शिवसेनेचा अंतर्गत मामला असेल तर भाजपाचे लोक या बिऱ्हाडाची एवढी कडकोट व्यवस्था का करत आहेत. या आमदारांना पहिल्यांदा सूरतमध्येच का नेण्यात आले? तिथे त्यांना कोणता मंत्र देण्यात आला असे अनेक सवाल संजय राऊत यांनी रोखठोकमधून उपस्थित केले आहेत.

अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकले

एकनाथ शिंदे हे चाळीस बंडखोर आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र शिंदेंचे हे बंड म्हणजे भूकंप नव्हे, अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टीकून आहे. आमदार येतात, जातात मात्र पक्ष संघटन ठाम असते. शिवसेनेतून भूजबळ फुटले, राणे फुटले हे मान्य की त्यांना एवढ्या आमदारांचे समर्थन मिळाले नाही. मात्र त्याचा परिणाम काय झाला? भूजबळांना समर्थन असून देखील त्यांचा पराभव झाला. तसेच राणे यांना देखील मोठा फटका बसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.