AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारण तापलं! भाजपसह शिंदे गटाची मागणी काय? अजित पवार यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन

भाजपकडून आज राज्यभर अजित पवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आंदोलन केले जात असून यानिमित्ताने राजकीय वातावरण तापलं आहे.

राजकारण तापलं! भाजपसह शिंदे गटाची मागणी काय? अजित पवार यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन
Image Credit source: Google
| Updated on: Jan 02, 2023 | 10:57 AM
Share

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी बोलत असतांना ते कधी धर्मवीर नव्हतेच, संभाजी राजे हे स्वराज्यरक्षक होते असा दावा केला होता. त्यावरून संपूर्ण राज्यात अजित पवार यांच्या विधानावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. त्यातच अजित पवार यांच्या विरोधात शिंदे गटासह भाजपकडून टीका होऊ लागली आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीसह भाजपच्या नेत्यानाकडून ठिकठिकाणी निषेध नोंदविला जात आहे. अजित पवार यांच्या विरोधात आज राज्यात भाजपच्या वतिने आंदोलन केले जाणार आहे. विविध शहरांत भाजपचे नेते आंदोलनात सहभागी होणार आहे. विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा अजित पवार यांनी द्यावा अशी मागणीच थेट भाजपच्या वतिने केली जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात राज्यातील वातावरण निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील राजकारण यानिमित्ताने तापू लागले आहे.

पुण्यासह आज नाशिकमध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन केले जाणार आहे. पुण्यात भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे.

तर नाशिकमध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थित आंदोलन केले जाणार आहे, नाशिकच्या आंदोलनात विविध नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा मागत अजित पवार पवार यांच्या विरोधात आंदोलन केले जाणार असल्याने राज्यातील वातावरण तापले आहे.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे छत्रपती हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते असा दावा केल्याने राज्यातील वातावरण यानिमित्ताने तापले आहे.

विधानसभेत अजित पवार यांनी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यानी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचे दाखले देऊन अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला होता.

त्यानंतर आता सत्ताधारीच अजित पवार यांच्या विरोधात एकवटले असून ठिकठिकाणी आज आंदोलन केले जाणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.