AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Shelar : महाराष्ट्र मराठी माणसाच्या परिश्रमातून उभा राहिला; तेजस्वी इतिहासाला नख लावू नका, शेलारांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध

भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नसल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

Ashish Shelar : महाराष्ट्र मराठी माणसाच्या परिश्रमातून उभा राहिला; तेजस्वी इतिहासाला नख लावू नका, शेलारांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध
नवी जबाबदारीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2022 | 1:14 PM
Share

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  (Bhagat Singh Koshyari) यांनी शुक्रवारी राजस्थानी समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्र आणि मुंबईतून जर  गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर मुंबईत पैसा उरणार नाही,  सध्या मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, मात्र या समाजाला जर बाहेर काढले तर मुंबईची ही ओळख पुसली जाईल असे राज्यपालांनी म्हटले होते. राज्यपालांच्या या वक्तव्याचा आता राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. भाजपा (BJP) नेते आशिष शेलार यांनी देखील राज्यपालांच्या या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये! असे  शेलार यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विरोधी पक्षांकडून निषेध

दरम्यान या वक्तव्यावरून  विरोधी पक्षातील नेत्यांकडून देखील  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्यांनी खुशाल त्या राज्यात जावून रहावे असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे देखील राज्यपालांच्या या वक्तव्यावर आक्रमक झाल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिकपद आहे, त्यामुळे त्या पदाबाबत बोलणे उचित नाही. मात्र राज्यपाल हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असतात, त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करते असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठी माणसांना डिवचू  नका म्हणत राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

राज्यपालांचा खुलासा

दरम्यान आता याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खुलासा केला आहे. मी काल जे काही बोललो त्यामध्ये मराठी माणसाला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी फक्त गुजराती आणि राजस्थानी व्यक्तींच्या व्यवसायातील योगदानाचा उल्लेख केला. महाराष्ट्र हा मराठी मानसाच्या कष्टातूनच निर्माण झाला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योगपती दिसून येतात असे राज्यापालांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत.
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न.
भाजप-राष्ट्रवादीचं सरकार दादांची इच्छा होती! तटकरेंचा मोठा खुलासा
भाजप-राष्ट्रवादीचं सरकार दादांची इच्छा होती! तटकरेंचा मोठा खुलासा.