AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Shelar : महाराष्ट्र मराठी माणसाच्या परिश्रमातून उभा राहिला; तेजस्वी इतिहासाला नख लावू नका, शेलारांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध

भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नसल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

Ashish Shelar : महाराष्ट्र मराठी माणसाच्या परिश्रमातून उभा राहिला; तेजस्वी इतिहासाला नख लावू नका, शेलारांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध
नवी जबाबदारीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2022 | 1:14 PM
Share

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  (Bhagat Singh Koshyari) यांनी शुक्रवारी राजस्थानी समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्र आणि मुंबईतून जर  गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर मुंबईत पैसा उरणार नाही,  सध्या मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, मात्र या समाजाला जर बाहेर काढले तर मुंबईची ही ओळख पुसली जाईल असे राज्यपालांनी म्हटले होते. राज्यपालांच्या या वक्तव्याचा आता राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. भाजपा (BJP) नेते आशिष शेलार यांनी देखील राज्यपालांच्या या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये! असे  शेलार यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विरोधी पक्षांकडून निषेध

दरम्यान या वक्तव्यावरून  विरोधी पक्षातील नेत्यांकडून देखील  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्यांनी खुशाल त्या राज्यात जावून रहावे असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे देखील राज्यपालांच्या या वक्तव्यावर आक्रमक झाल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिकपद आहे, त्यामुळे त्या पदाबाबत बोलणे उचित नाही. मात्र राज्यपाल हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असतात, त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करते असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठी माणसांना डिवचू  नका म्हणत राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

राज्यपालांचा खुलासा

दरम्यान आता याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खुलासा केला आहे. मी काल जे काही बोललो त्यामध्ये मराठी माणसाला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी फक्त गुजराती आणि राजस्थानी व्यक्तींच्या व्यवसायातील योगदानाचा उल्लेख केला. महाराष्ट्र हा मराठी मानसाच्या कष्टातूनच निर्माण झाला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योगपती दिसून येतात असे राज्यापालांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.