एकनाथ शिंदेंचा ‘तो’ निर्णय योग्यच होता हे पुन्हा सिद्ध झालं; आशिष शेलांरांची ग्रामपंचायत निकालावर पहिली प्रतिक्रिया

आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची घोषणा होत आहे.  आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये भाजप आणि शिंदे गट आघाडीवर आहेत.

एकनाथ शिंदेंचा 'तो' निर्णय योग्यच होता हे पुन्हा सिद्ध झालं; आशिष शेलांरांची ग्रामपंचायत निकालावर पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Sep 19, 2022 | 1:58 PM

मुंबई : आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची घोषणा होत आहे.  आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये भाजप (BJP) आणि शिंदे गट आघाडीवर आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने सर्वाधिक 138 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 100 जागा आल्या आहेत.  या निकालावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  आम्ही या विजयाचा शांततेत स्विकार करतो. आम्ही यापुढे अधिक जोमाने जनतेची सेवा करू असं त्यांनी म्हटलं आहे.  पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे ज्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडले, तो त्यांचा निर्णय योग्यच असल्याचे पुन्हा एकदा या निकालाने स्पष्ट झाले आहे. त्यांनी यावेळी राष्ट्रवादीला देखील टोला लगावला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष काही राज्यस्थरीय पक्ष नसून दोन, अडीच जिल्ह्यांपुरता पक्ष असल्याचे शेलार यांनी म्हटलं आहे.

 

 

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.