AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाचा बिग गेम, थेट मुख्यमंत्री यांचा भाजप प्रवेश, काँग्रेसला दिला जोर का झटका

काँग्रेस पक्ष जनतेचा कौल समजू शकलेला नाही. पक्ष नेत्तृत्वाला काय चुकीचे आहे हे कळत नाही. झालेल्या चुकीचे विश्लेषण करत नाहीत किंवा झालेली चूक दुरुस्त करण्याचा निर्णयही घेत नाहीत, अशी टीका...

भाजपाचा बिग गेम, थेट मुख्यमंत्री यांचा भाजप प्रवेश, काँग्रेसला दिला जोर का झटका
CONGRESS LEADER RAHUL GANDHIImage Credit source: TV9 NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Apr 07, 2023 | 3:00 PM
Share

आंध्र प्रदेश : स्थापना दिनाच्या दिवशीच भाजपने काँग्रेसला धक्का दिला होता. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला होता. अनिल अँटोनी यांना भाजपात प्रवेश देतानाच राहुल गांधी यांच्याविरोधात वायनाड मतदारसंघातुन लोकसभा उमेदवारी देण्याचे भाजपने संकेत दिले आहेत. त्यापाठोपाठ आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला ‘जोर का झटका’ दिला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे. अशातच या माजी मुख्यमंत्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रेड्डी हे अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते. 2014 साली तेलंगणाची निर्मिती झाली. त्यांनंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला सोड चिट्ठी देत स्वतःचा ‘जय समैक्‍य आंध्र’ हा पक्ष स्थापन केला होता. मात्र, 2018 मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा पक्षात परतीचा मार्ग धरला होता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेसपासून फारकत घेऊ शकत नाही, असे ते त्यावेळी म्हणाले होते.

सध्या आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेसची सत्ता आहे. तर, विधानसभा निवडणूकीसाठी एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. अशावेळी किरणकुमार रेड्डी यांनी पुन्हा काँगेससोबत फारकत घेतली आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका

कॉंग्रेस नेतृत्वासोबत झालेल्या वादामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असे बोलले जात आहे. काँग्रेस पक्ष जनतेचा कौल समजू शकलेला नाही. पक्ष नेत्तृत्वाला काय चुकीचे आहे हे कळत नाही. झालेल्या चुकीचे विश्लेषण करत नाहीत किंवा झालेली चूक दुरुस्त करण्याचा निर्णयही घेत नाहीत, अशी टीका किरणकुमार रेड्डी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

माझा राजा खूप हुशार

फक्त आपणच बरोबर आहोत बाकीचे चूक आहेत असे पक्ष नेतृत्वाला वाटत आहे. याच विचारसरणीमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. हायकमांडच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाची वाताहत होत आहे. ही एका राज्याची बाब नाही. माझा राजा खूप हुशार आहे, तो स्वतः विचार करत नाही आणि कोणाच्या सूचना ऐकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

आगामी विधानसभा निवडणूक होण्यासाधीच किरणकुमार रेड्डी यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला राज्यात बळ मिळाले आहे. तर, काँग्रेससाठी हा जोर का झटका मानण्यात येत आहे. तर, दक्षिण भारतातील राज्यात विस्ताराची अपेक्षा असणाऱ्या भाजपला मात्र प्रवेश फायद्याचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य