AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तेच्या लालसेतून शिवसेनेकडून धोका, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार नव्हे, सर्कस : राजनाथ सिंह

"महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली 'सर्कस' होत आहे" अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली. (Rajnath Singh on Shivsena)

सत्तेच्या लालसेतून शिवसेनेकडून धोका, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार नव्हे, सर्कस : राजनाथ सिंह
| Updated on: Jun 09, 2020 | 8:11 AM
Share

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी अभिनेता सोनू सूदवर ‘सामना’तून झालेल्या टीकेवरुन शिवसेनेवर शरसंधान साधले. तसेच, सत्तेच्या लालसेतून शिवसेनेने धोका दिला, आता महाराष्ट्रात सरकार नसून सर्कस सुरु असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली. (Rajnath Singh criticises Shivsena and Maharashtra Government)

राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधित केले. यावेळी राजनाथ सिंह यांनी सोनू सूदचेही कौतुक केले. ‘मी टीव्हीवर पाहिले की अभिनेता सोनू सूद या संकटात अडकलेल्या कामगारांना मदत करत आहे. पण संकटात अडकलेल्या मजुरांना मदत करणार्‍या व्यक्तीवर काही जण टीका करत आहेत.’ असा निशाणा राजनाथ सिंह यांनी साधला.

“महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही” अशी टीका त्यांनी केली.

(Rajnath Singh criticises Shivsena and Maharashtra Government)

राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला युती तोडल्याबद्दल कडाडून टोला लगावला “जेव्हा निवडणुका लढल्या गेल्या, तेव्हा भाजपशी शिवसेनेने युती केली. पण युतीनंतर सत्तेच्या लालसेतून भाजपला धोका दिला. मला विश्वास नाही बसत ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे” असा घणाघात राजनाथ सिंह यांनी केला.

“काँग्रेस नेते राहुल गांधी सांगतात की आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत, पण निर्णयात नाही. म्हणजे जेव्हा संकट येते, तेव्हा हे हात झटकतात” अशी टीका राजनाथ यांनी केली.

हेही वाचा : भाजपचे नेते गेल्यानंतर 3 महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि पवारांना बाहेर पडावंसं वाटलं : चंद्रकांत पाटील

मुंबईतील रुग्णालयांच्या परिस्थितीचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले, “काही रुग्णालयांमध्ये जिथे मृतदेह पडलेले आहेत, तिथेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत आहेत. तिथे सरकार नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही का? सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. कोविडशी लढण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत” असे आश्वासन राजनाथ यांनी दिले. (Rajnath Singh criticises Shivsena and Maharashtra Government)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.