AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य प्रदेशात भाजपचा आमदार खासदार झाल्याने कमलनाथ सरकार सुरक्षित

भोपाळ : राजकारणात कोणत्या गोष्टीचा फायदा कुणाला होईल याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशातही असंच झालंय. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला असला तरी विधानसभेत मात्र काँग्रेस सध्या तरी सुरक्षित आहे. मध्य प्रदेशचे रतलाममधील आमदार खासदार झाल्यामुळे काँग्रेसला फायदा झालाय. भाजपचा एक आमदार कमी झाल्यामुळे काँग्रेसची स्थिती काही प्रमाणात मजबूत झाली आहे. आमदार जीएस दामोर […]

मध्य प्रदेशात भाजपचा आमदार खासदार झाल्याने कमलनाथ सरकार सुरक्षित
| Edited By: | Updated on: May 28, 2019 | 9:27 PM
Share

भोपाळ : राजकारणात कोणत्या गोष्टीचा फायदा कुणाला होईल याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशातही असंच झालंय. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला असला तरी विधानसभेत मात्र काँग्रेस सध्या तरी सुरक्षित आहे. मध्य प्रदेशचे रतलाममधील आमदार खासदार झाल्यामुळे काँग्रेसला फायदा झालाय. भाजपचा एक आमदार कमी झाल्यामुळे काँग्रेसची स्थिती काही प्रमाणात मजबूत झाली आहे.

आमदार जीएस दामोर यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं होतं. दामोर यांची संसदेवर निवड झाल्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी राजीनामा दिल्यास 230 सदस्यसंख्या असलेला आकडा 229 वर येईल. जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत ही परिस्थिती राहू शकते. सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेतली जाते. दुसरीकडे झाबुआ मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक बाकी आहे. काँग्रेसकडे सध्या 115 आमदार आहेत. त्यामुळे काही दिवसांसाठी का होईना अस्थिरतेचा धोका टळला आहे.

काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून सातत्याने केला जातोय. 229 वर संख्याबळ आल्यामुळे काँग्रेसची स्थिती आणखी मजबूत झाल्याचं भाजप नेतेही मान्य करतात. तर विरोधी पक्ष नेते गोपाल भार्गव यांनी अनेकदा सरकार पाडण्याचा इशारा दिलाय. पण तूर्तास आम्हाला कोणतीही घाई नसल्याचंही ते म्हणाले.

आमदार असताना संसदेत निवड झाल्यानंतर आमदारकी किंवा खासदारकी यापैकी एक निवडणं गरजेचं असतं. रतलामचे आमदार यापैकी काय निवडतील यावरही भाजप नेत्याने उत्तर दिलं. राज्यातच राहण्याची आता कोणतीही शक्यता नाही. कारण काँग्रेसवाले अगोदरच घाबरलेले आहेत. आम्हाला काहीही करण्याची गरज नाही. त्यांच्यातच अंतर्गत वाद चालू आहेत आणि एक दिवस सरकार आपोआप पडणार आहे, असं एका भाजप नेत्याने सांगितलं.

Follow Us
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.