AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule : अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपाचं नुकसान? प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं उत्तर काय?

Chandrashekhar Bawankule : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज, मनसेसोबत युती, मराठा आरक्षण, अजित पवार यांना सोबत घेणं या विषयावर मत मांडली आहेत.

Chandrashekhar Bawankule : अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपाचं नुकसान? प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं उत्तर काय?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2024 | 4:05 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज सुनेत्रा पवार यांनी राज्य सभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी महायुतीमधून शिवसेना आणि भाजपाचे नेते उपस्थित नव्हते. आज यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “सुनेत्रा पवारांना दिलेली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. महायुती मधून त्यांना सगळ्यांच समर्थन आहे. मात्र महायुतींमधून हा नाही गेला, तो नाही गेला, याला काही अर्थ नाही” राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण काय बोलले? हे मला अजिबात माहिती नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची मनसेने पूर्ण तयारी केली होती. पण भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरुन मनसेने अखेरच्या क्षणी माघार घेतली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे बोलले आहेत. “राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदीजींना पाठिंबा दिला होता . इतर निवडणुकीबाबत आमची त्यांची चर्चा बाकी आहे. चर्चा झाल्यावर यातून मार्ग निघेल” असं पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

‘अजित पवारांना घेऊन भाजपच कोणतही नुकसान नाही’

“मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सरकारचे शीष्टमंडळ गेल आहे, त्यातून मार्ग निघेल” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “अजित पवारांना घेऊन भाजपच कोणतही नुकसान नाही. उलट 2019 च्या तुलनेत भाजपची मतं वाढली. मात्र जागा कमी झाल्या हे सत्य आहे” असं बावनकुळे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील लोक हरल्यावर ईव्हीएमला दोष देतात. मात्र जिंकलेल्या जागा असतील, तिथे ईव्हीएम वर संशय का घेत नाहीत? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?