सहकार क्षेत्र संपवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा घाट, जयंत पाटलांचा गंभीर आरोप

भाजपला महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील सहकार मोडून काढायचा आहे. मोदीसाहेबांशिवाय कुणी काही काम केले नाही पाहिजे, अशी भावना भाजपची असल्याची टीकाही पाटील यांनी केलीय.

सहकार क्षेत्र संपवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा घाट, जयंत पाटलांचा गंभीर आरोप
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 11:17 PM

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केलाय. केंद्र सरकार सहकार क्षेत्र संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. गोरगरीब, खेड्यातील सामान्य माणूस, शहरातील माणसं आणि मध्यमवर्गीय एकत्र येऊन अतिशय चांगल्या पध्दतीने बॅंका चालवतात. त्या बॅंकांवर निर्बंध आणणं चुकीचं आहे. रिझर्व्ह बॅंकेचं हे धोरण निषेधार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सहकार क्षेत्राला संपवण्याचा प्रयत्न करत, अशा शब्दात पाटील यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलंय. (central government is trying to end the co-operative sector, Jayant Patil’s allegation)

दरम्यान सीबीआय, ईडीनंतर आता रिझर्व्ह बॅंकेचा दबाव आणला जात आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘आता तुम्हीच समजून जा’ असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलंय. खाजगी बॅंका सामान्य लोकांना दारात उभ्या करत नव्हत्या, असं लक्षात आल्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बॅंकांचे राष्ट्रीयकरण केले. सहकार म्हणजे सामान्य लोकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली शक्ती. त्या शक्तीतून अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. परंतु भाजपला महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील सहकार मोडून काढायचा आहे. मोदीसाहेबांशिवाय कुणी काही काम केले नाही पाहिजे, अशी भावना भाजपची असल्याची टीकाही पाटील यांनी केलीय.

अर्थव्यवस्थेची प्रगती कशी होणार?

लोकप्रतिनिधींनी चुका केल्यानंतर रिझर्व्ह बॅंका किंवा नाबार्डकडे कंट्रोल असायला हवा अशी मागणी आहे. परंतु नाबार्डचा कंट्रोल जाऊन रिझर्व्ह बॅंकेने कंट्रोल घेतला आहे. आता रिझर्व्ह बॅंकेने सगळ्या संचालक मंडळावर आणखी एक सल्लागार मंडळ नेमावे, असे आदेश दिले आहेत. एवढे नियंत्रण केल्यावर आपल्या अर्थव्यवस्थेची प्रगती कशी होणार? असा प्रश्न विचारतानाच अर्थव्यवस्था वाढवायची असेल तर लिबरल विचार हवेत असंही पाटील म्हणाले.

‘संस्थेला स्वत: प्रगती करायला परवानगी द्यावी’

प्रत्येक गोष्टीत सरकार जर लिबरल असेल तर अर्थव्यवस्थेची प्रगती फार वेगाने होते. मात्र, केंद्र सरकार रिस्टिक्टीव्ह अशा रेझीम्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नियम, कायदे करून अंकुश आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सरकारने भ्रष्टाचारा विरोधात पावलं उचलावी. जोपर्यंत भ्रष्टाचाराचा एखादा मुद्दा समोर येत नाही, तोपर्यंत त्या संस्थेला स्वतः प्रगती करायला परवानगी द्यावी, अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली आहे.

संबंधित बातम्या : 

राजकारणातील मंडळीना अशी भीती दाखवायला लागले तर लोकशाहीच संपुष्टात येईल, देशमुखांवरील कारवाईवरुन जयंत पाटलांचा केंद्रावर निशाणा

‘ओबीसींचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा, सत्तेत येण्याची गरज नाही’, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

central government is trying to end the co-operative sector, Jayant Patil’s allegation

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.