AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: सक्षम नसतो तर एवढा मोठा ‘कार्यक्रम’ केला असता का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला टोला

Eknath Shinde : जनतेतून निवडून द्या, जनतेतून निवडून द्या, असं अजितदादा तुम्ही म्हणत होतात. एखादा पैसेवाला असेल दादागिरी करणारा असेल तर तो एखाद्या वॉर्डात परिणाम करेल. पण अख्ख्या शहरात करू शकत नाही. हे पुरोगामी राज्य आहे.

Eknath Shinde: सक्षम नसतो तर एवढा मोठा 'कार्यक्रम' केला असता का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला टोला
सक्षम नसतो तर एवढा मोठा 'कार्यक्रम' केला असता का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला टोलाImage Credit source: vidhansabha
| Updated on: Aug 22, 2022 | 6:53 PM
Share

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडून आणण्याचं विधेयक विधानसभेत (vidhansabha) मांडलं. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास खातं तुमच्याकडे होतं. तेव्हा तुम्ही नगराध्यक्ष आणि सरपंच लोकांमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. आता तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुमच्याचकडे नगरविकास खाते आहे. तरीही तुम्ही तुमचाच निर्णय बदलत आहात. तुम्ही स्वत:च्या विचारावर निर्णय घ्या, असा हल्ला शिवसेनेने (shivsena) एकनाथ शिंदे यांच्यावर चढवला. शिंदे यांनीही शिवसेनेच्या या हल्ल्याचा समाचार घेतला. मी सक्षम नसतो. तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?, असा टोलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला. शिंदे यांच्या या उत्तरामुळे सभागृहात एकच खसखस पिकली.

नगराध्यक्ष आणि सरपंचांना थेट लोकांमधून निवडून देण्याचं विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं. त्याला शिवसेनेसह विरोधकांनी आक्षेप घेतला. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तुम्ही स्वत:च्या विचाराने निर्णय घ्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं. तर, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही शिंदे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते. तेव्हा निर्णय काय घेतला आणि मुख्यमंत्री झाल्यावर निर्णय काय घेतला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं एकनाथ राहावं ऐकनात होऊ नये, ऐकनाथ होण्यामुळे घेतलेले निर्णय स्वत:ला बदलण्याची वेळ येते, अशी टीका मुंडे यांनी केली होती. या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला.

देवेंद्रजी और मै है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ

मी कुणाचं ऐकतोय? मी जनतेचं ऐकतोय. आमचा अजेंडा काहीच नाही. जे जनता बोलेल तेच ऐकणार. त्यामुळे भास्करराव म्हणाले, तुम्ही स्वत:च्या विचारावर निर्णय घेतला पाहिजे. काम केलं पाहिजे. त्यांना सांगतो. काही काळजी करू नका. मी सक्षम आहे. देवेंद्रजी और मै है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ. त्यामुळे मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?, असा टोला त्यांनी लगावला.

यापूर्वीही अनेकदा निर्णय बदलले

तुम्ही केलेल्या सूचनेचा आदर राखू. काही अडचणी असेल तर दूर करू. आम्ही गुवाहाटीला असताना सरकार अल्पमतात आलं. पटापट 400 जीआर काढले. त्यामुळे ते थांबवणार नाही का? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. निर्णय आपण आताच बदलले नाही. जेव्हा एखादा निर्णय होतो. जेव्हा त्याचे फायदे तोटे लक्षात येतात. तेव्हा तो निर्णय बदलत असतो. नगरविकास विभागाने निर्णय घेतला म्हणजे तो नगरविकास मंत्र्याचा निर्णय नसतो. तो सामूहिक निर्णय असतो. सरकारचा निर्णय असतो. महाविकास आघाडीत आपण अनेक निर्णय बदलले. भाजप-सेना युतीचे निर्णय बदलले, असंही त्यांनी सांगितलं.

एखाद्या वॉर्डात घोडेबाजार होईल

जनतेतून निवडून द्या, जनतेतून निवडून द्या, असं अजितदादा तुम्ही म्हणत होतात. एखादा पैसेवाला असेल दादागिरी करणारा असेल तर तो एखाद्या वॉर्डात परिणाम करेल. पण अख्ख्या शहरात करू शकत नाही. हे पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे आव्हाड साहेब संपूर्ण शहरात परिणाम करू शकतो का? मुंब्र्यात दोनचार वॉर्डात तुम्ही करू शकता. संपूर्ण ठाणे शहरात आपण करू शकत नाही. कारण याचा अर्थ सरळ आहे की, त्या शहरातील मतदार मतदान करत असतात. एका वॉर्डात घोडेबाजार होऊ शकतो. संपूर्ण शहरात होऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.