AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | शिंदे-फडणवीस दिल्लीत, मंत्रिमंडळ विस्तार कधी? मुख्यमंत्र्यांचं उत्तर वाचा!

राज्यातील कोणत्या आमदाराला कोणतं मंत्रिपद मिळणार, याकडे अवघा महाराष्ट्र डोळे लावून बसलाय. पण ही प्रक्रिया कधी होणार, या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलं.

Eknath Shinde | शिंदे-फडणवीस दिल्लीत, मंत्रिमंडळ विस्तार कधी? मुख्यमंत्र्यांचं उत्तर वाचा!
Image Credit source: twitter
| Updated on: Jul 09, 2022 | 3:41 PM
Share

नवी दिल्लीः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम जनतेला आता मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra cabinet) आस लागली आहे. भाजप आणि शिंदे (Eknath Shinde) गटातील प्रमुख आमदारांमध्ये वारंवार बैठका होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नुकतेच दिल्लीत गेले आहेत. महाराष्ट्रातील खातेवाटपावर दिल्लीतील भाजप श्रेष्ठींसमोर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल हे दोघेही दिल्ली पोहोचले. आज शिंदे आणि फडणवीस यांनी दिल्ली भेटीचा नेमका काय अजेंडा आहे, हे पत्रकारांसमोर स्पष्ट केले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचंही उत्तर दिलं.

मंत्रिमंडळ विस्तार कधी?

राज्यातील कोणत्या आमदाराला कोणतं मंत्रिपद मिळणार, याकडे अवघा महाराष्ट्र डोळे लावून बसलाय. पण ही प्रक्रिया कधी होणार, या प्रश्नाचं उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ दिल्लीतील आजची अमित शहा, नरेंद्र मोदी यांची भेट सदिच्छा भेट आहे. उद्या आषाढी झाली तर मुंबईत भेटून यावर चर्चा करू. 18 तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या मागे पुढे खातेवाटप होऊ शकते. पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्र्यांचा शपथ होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

घडामोडींची जगाने दखल घेतलीय..

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराची जगाने दखल घेतली आहे. यात फडणवीसांचं योगदान मोठं आहे. हे सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ देशात आणि राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्याची देशाने नोंद घेतली आहे. किंबहुना जगाने दखल घेतली आहे. पण आमची जबाबदारी वाढली आहे. सर्वांना न्याय द्यायचा आहे. आमचा एक प्लसपॉइंट आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि जलयुक्त शिवार हे प्रकल्प आम्ही पुढे नेणार आहोत. राज्याला गतवैभव आणून देऊ. कारण हे प्रकल्प मधल्या काळात रखडली होती. हे सामान्य लोकांचे प्रकल्प आहेत.

महाराष्ट्राचे तुकडे होणार?

भाजपाला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत, असा आरोप शिवसेनेकडून होतोय. यावर प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, ‘महाराष्ट्राचे तुकडे हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पण राज्यातील जनता सूज्ञ आहे. कोणी काही बोलो. आम्ही त्यावर बोलणार नाही. आम्ही आमचं काम करू…

Follow Us
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला.
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र..
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र...
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र.