AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे- नरेंद्र मोदी भेटीचे तीन अर्थ, फडणवीस-पवार भेटीशी संबंध आहे का?

जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भेटतात, तेव्हा ठाकरे- मोदी भेटीची चर्चा तर होणारच

उद्धव ठाकरे- नरेंद्र मोदी भेटीचे तीन अर्थ, फडणवीस-पवार भेटीशी संबंध आहे का?
Uddhav Thackeray_Narendra Modi
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jun 08, 2021 | 7:09 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. राज्यातील मराठा आरक्षणासह (Maratha reservation) विविध 12 मुद्दे यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट झाली त्यावेळी अजित पवार आणि अशोक चव्हाणही उपस्थित होते. मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. (CM Uddhav Thackeray met PM Narendra Modi what is political Interpretation)

या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भेटतात, तेव्हा ठाकरे- मोदी भेटीची चर्चा तर होणारच, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिली. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संवाद प्रारंभ केला, याचा आनंद आहे. संवादाचा नेहमी फायदाच होतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राजकीय विश्लेषक आणि लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी या भेटीचे राजकीय अर्थ काय असू शकतात, यावर भाष्य केलं आहे.

ठाकरे- मोदी भेटीचे तीन अर्थ

1) संदीप प्रधान यांच्या मते, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बंद दाराआड झालेली चर्चा ही अर्थातच राजकीय असणार आहे. गेल्या काही दिवसात भाजपच्या राज्यातील नेत्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या एजन्सीकडे तक्रारी करून ठाकरे कुटुंब यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यासंदर्भात कारवाईचा बडगा ठाकरे कुटुंबीयांवर उगारला जाऊ नये याबाबत चर्चा झालेली असू शकते.

2) याखेरीज दोन चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना ऊत आला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर अशाच राजकीय चर्चांना ऊत यावा याकरिता कदाचित उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले असू शकते.

3) तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात जर शिवसेनेला काही राजकीय निर्णय घ्यायचा असेल, तर त्याबाबतची चर्चा ही केवळ मोदींच्या पातळीवर होऊ शकते असा संकेत राज्यातील भाजपच्या नेत्यांना देणे हाही उद्धव ठाकरे यांचा हेतू असू शकतो, असे मत संदीप प्रधान यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राचं शिष्टमंडळ मोदींच्या भेटीला 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एकूण 12 मागण्या मांडल्या आहेत. ओबीसी, मराठा आणि पदोन्नतीतील आरक्षणासह विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे. मोदींनी या मागण्या गंभीरपणे ऐकून घेऊन त्यात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवले जातील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या  

‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांचा पंतप्रधान मोदींना शब्द

मराठा आरक्षण ते मेट्रो कारशेड, मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडल्या 12 मागण्या; वाचा सविस्तर

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली?, वाचा महत्त्वाचे आणि मोठे 10 मुद्दे

(CM Uddhav Thackeray met PM Narendra Modi what is political Interpretation)

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.