AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे, बाळासाहेब थोरातांचा टोला

राहुल गांधी हे गरीब माणसांमध्ये मिसळतात, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दानवेंना उत्तर दिले

दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे, बाळासाहेब थोरातांचा टोला
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 05, 2020 | 2:14 PM
Share

मुंबई: राहुल गांधी यांना रस्त्यावरील आंदोलनाची सवय नाही, असे वक्तव्य करणारे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांना काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रावसाहेब दानवे किती रस्त्यावर असतात हे आम्हा सर्वांना माहिती आहे. मुळात ते लाटेवर निवडून आले आहेत. परिणामी त्यांच्याविषयी फार बोलण्याची गरज नाही. याउलट राहुल गांधी हे गरीब माणसांमध्ये मिसळतात, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Balasaheb Thorat hits back Raosaheb Danve)

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी हाथरस बलात्कार प्रकरणावरुन भाजपला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी म्हटले की, मुलींवर होणारा अन्याय देश सहन करु शकत नाही. सर्वांच्याच भावना तीव्र आहेत. समाज उत्स्फुर्तपणे रस्त्यावर येत असताना भाजपची भूमिका संशयास्पद आहे. भाजपचे आमदार केवळ संस्कृतीच्या गप्पा मारतात. हाथरसमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाले, ती संस्कारित नव्हती का? ज्या मुलांनी तिच्यावर अत्याचार केले, ते संस्कारित होते का, असा सवालही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे? हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांना कोणीही धक्काबुक्की केली नाही. मात्र, त्यांना जास्त गर्दीत फिरायची सवय नाही. त्यामुळे ते पडले. विरोधी पक्ष नेते म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, अशी खोचक टिप्पणी रावसाहेब दानवे यांनी केली होती.

आता जनजीवन सुरळीत करायलाच पाहिजे- बाळासाहेब थोरात कोरोनाची साथ येऊन आता सहा महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे आता भविष्यात कोरोनासह जगावे लागणार, ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही. त्यामुळे आता जनजीवन सुरळीत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांनी आपली काळजी घेतली पाहिजे. नियमांचे पालन करत जनजीवन सुरळीत केले पाहिजे. अर्थव्यवस्था बंद करुन चालणार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. (Balasaheb Thorat hits back Raosaheb Danve)

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना धक्काबुक्की नाहीच, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले : रावसाहेब दानवे

(Balasaheb Thorat hits back Raosaheb Danve)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.