1948, 1965, 1971 आणि 1999 ची युद्ध आम्ही जिंकली, आता तुमची वेळ, काँग्रेसचं मोदींना चॅलेंज

केंद्राला चीनविरोधात कडक भूमिका घेण्याचे सांगत चिनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडाला दिलेली देणगी परत करण्याचे आवाहनही कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केले.

1948, 1965, 1971 आणि 1999 ची युद्ध आम्ही जिंकली, आता तुमची वेळ, काँग्रेसचं मोदींना चॅलेंज
Follow us
| Updated on: Jun 30, 2020 | 1:07 PM

नवी दिल्ली : “1948, 1965, 1971 आणि 1999 ची युद्ध आम्ही जिंकली, आता तुमची वेळ आहे” अशा शब्दात काँग्रेस नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. सिंह यांनी केंद्राला चीनविरोधात कडक भूमिका घेण्याचे सांगत चिनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडाला दिलेली देणगी परत करण्याचे आवाहनही केले. (Captain Amarinder Singh targets Modi Government)

“आम्ही 1948, 1965, 1971 आणि 1999 ची युद्ध जिंकली, आता चीनला सडेतोड उत्तर देण्याची तुमची (केंद्र सरकार) वेळ आहे” असे सिंह म्हणाले. “चीनशी आपला 60 च्या दशकापासून वाद सुरु आहे. गलवानची घटना पहिलीच नाही. मला खात्री आहे की भारत सरकार सैन्याबाबत आवश्यक ती खबरदारी घेत आहे” अशी आशा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केली.

“मला वाटते की, अक्साई चीन आणि सियाचीनमधील दरी बंद करण्याच्या चीनच्या हेतूविषयी आपण सावध राहिले पाहिजे. भारताने चीनविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी” असे कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले.

हेही वाचा : 1962 ते आजच्या घडामोडी, संसदेत दोन हात करुया, अमित शाहांचे राहुल गांधींना खुले आवाहन

“काही चिनी कंपन्यांनी पंतप्रधान निधीला पैसे दान केले आहेत. सीमेवर संघर्षाची परिस्थिती आहे, आपले जवान शहीद होत आहेत आणि भारतीय भागात घुसखोरी केली जात आहे, अशा परिस्थितीत शेजारच्या देशातून कोणत्याही प्रकारची रक्कम मिळाली तर ती परत करावी.” असे मत कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केले.

“किती पैसे आले? हा प्रश्नच नाही. सर्वात आधी जेव्हा ते (चीन) कोरोनासाठी जबाबदार आहेत. आणि आपल्या देशावरील आक्रमणासाठीही जबाबदार असतात, त्यावेळी एखाद्या चिनी कंपनीकडून एक रुपयाही आला, तरी तो परत केला पाहिजे. स्वत:ची देखभाल करण्यासाठी भारताला चीनच्या पैशांची गरज नाही. आम्ही त्याशिवायही समर्थ आहोत” असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

(Captain Amarinder Singh targets Modi Government)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.