AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना दिल्ली भेटीचं निमंत्रण, राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार की नाहीत? मोठी बातमी आली समोर

"महाराष्ट्र आणि देशातील राजकारणातील विरोधकांच्या एकीबाबत चर्चा झाली. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निरोपाची माहिती वेणुगोपाल यांनी दिली", असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी दिलेला निरोप नेमका काय होता ते पत्रकार परिषदेच्या शेवटी समोर आलं.

उद्धव ठाकरे यांना दिल्ली भेटीचं निमंत्रण, राहुल गांधी 'मातोश्री'वर जाणार की नाहीत? मोठी बातमी आली समोर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 17, 2023 | 9:41 PM
Share

मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल (K C Venugopal) यांनी आज मुंबईत दाखल होत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. के. सी. वेणुगोपाल यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप हे देखील होते. या भेटीनंतर उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि वेणुगोपाल यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर येणार का? या प्रश्नाचं उत्तर दिलं. विशेष म्हणजे वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला येण्याचं निमंत्रण दिलं.

“महाराष्ट्र आणि देशातील राजकारणातील विरोधकांच्या एकीबाबत चर्चा झाली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निरोपाची माहिती वेणुगोपाल यांनी दिली”, असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी दिलेला निरोप नेमका काय होता ते पत्रकार परिषदेच्या शेवटी समोर आलं. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ठाकरेंना दिल्ली भेटीचं निमंत्रण दिलं आहे. ठाकरे दिल्लीत गेल्यानंतर राहुल गांधी मुंबईत त्यांच्या भेटीसाठी येणार असल्याचं स्पष्ट विधान वेणुगोपाल यांनी केलं. “मी उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की, त्यांनी दिल्लीत यावं. उद्धव ठाकरे आधी दिल्लीत आले की राहुल गांधी मुंबईत येतील”, असं वेणुगोपाल म्हणाले.

“मी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा निरोप घेऊन मी आलो आहे. आमचा मेसेच हा स्पष्ट आहे, सध्याची राजकीय परिस्थिती, उद्धव ठाकरे कसा लढा देत आहेत, देशाची राजधानी कशाप्रकारे संपवली जात आहे याचे आपण साक्षीदार आहोत. दिवसेंदिवस ईडी, सीबीआय शिवसेना आणि विरोधी पक्षांना टार्गेट करत आहेत. काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे. या लढ्यात आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही 19 ते 20 विरोधी पक्ष एकत्र आहोत. प्रत्येक विरोधी पक्ष एकत्र येत आहे”, असं वेणुगोपाल यांनी सांगितलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही विरोधात प्रत्येक विरोधी पक्षाला लढायचं आहे. ही बाब सर्वांमध्ये साम्याची आहे. प्रत्येक पक्षाची वेगवेगळी विचारधारा आहे. पण सध्या लोकशाही वाचवण्यासाठी सर्व एकत्र आलो आहोत. आम्ही एकसाथ आहोत. हाच मेसेज आम्हाला द्यायचा आहे”, असं यावेळी वेणुगोपाल म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“आमच्या भेटीचा उल्लेख वेणुगोपाल यांनी स्पष्ट शब्दांत केलं आहे. देशासमोरचा प्रश्न फार मोठा आहे. नुसतं विरोधी पक्षाचं समीकरण हा मुद्दा नाही. तर देशात मी करण चाललं आहे. त्याविरोधात आम्ही एकत्र येत आहोत. प्रत्येक पक्षाची आयडोलॉजी आहे. पण लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. निवडणुका जवळ आल्या आहेत. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा मधल्या काळात बोलले की सर्वच पक्ष संपतील. सत्ता भक्षक हा शब्द त्यांच्यासाठी योग्य ठरतो. शिवसेना देशासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरली आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“वेणुगोपाल यांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही जेव्हा मैत्री जपतो तेव्हा ती फक्त मैत्री राहत नाही तर एक नातं असतं. भाजपसोबत आम्ही मैत्री जपली. पण त्यांना त्याची जाणीव राहिली नाही. हरकत नाही. आपण देशाच्या लोकशाहीसाठी एकत्र लढू”, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

Follow Us
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
Nashik | क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, झाडे पडली, सिरसे गावात हाहाकार
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू