AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar : पराभवानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा महाविकास आघाडीत भूकंप घडवणारा मोठा आरोप

Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खूप मोठा आरोप केला आहे. आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठी बिघाडी होऊ शकते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दीड महिना लोटल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी इतका गंभीर आरोप केला आहे.

Vijay Wadettiwar : पराभवानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा महाविकास आघाडीत भूकंप घडवणारा मोठा आरोप
विजय वडेट्टीवार
| Updated on: Jan 10, 2025 | 10:24 AM
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. राज्यात सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते विजय वेडट्टीवार यांनी महाविकास आघाडीत भूकंप घडवणारा खूप मोठा आरोप केला आहे. त्यांनी थेट कोणाच नाव घेतलेलं नाही, पण आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे. अप्रत्यक्षपणे भाजपला मदत झाल्याच त्यांना सूचित करायच आहे. “नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते तिथे होते. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतो. परंतु जागावाटपाचा तिढा दोन दिवसात सुटला असता, तर 18 दिवस प्रचारासाठी, प्लानिंगसाठी मिळाले असते. आम्ही कुठलही प्लानिंग करु शकलो नाही” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

“आम्हाला निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. ही अनेक कारण झाली. त्यामुळे हे एक मुख्य कारण आहे, जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ याचा फटका नक्की बसला” असं विजय वेडट्टीवर म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, जागा वाटपात तुम्हाला काही शंका आहे का? त्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. कदाचित महाविकास आघाडीत आता यावरुन नव्याने गंभीरस्वरुपाचे आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात.

‘बैठकीची वेळ 11 वाजताची, यायच दुपारी 2 वाजता’

“मी म्हटलना, हे प्लानिंग आहे का? इतका वेळ वाया घालवला. बैठकीची वेळ 11 वाजताची, यायच दुपारी 2 वाजता. अनेक नेते उशिरा येत होते. त्यात मी कोणाचा नाव घेणार नाही. यामुळे बैठकांचा वेळ लांबत गेला. एकेका जागेवरुन वारंवार त्याच त्याच गोष्टी होत गेल्या. कदाचित महाराष्ट्रात मविआचा जागा वाटपाचा घोळ दोन दिवसात संपला असता, तर आम्हाला नक्कीच फायदा झाला असता. 20 दिवस जागावाटपात गेले. वेळ घालवण्यामध्ये षडयंत्र, काही प्लानिंग होतं का? अशी शंका घेण्यास हरकत नाही” असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत   मविआला फक्त 46 जागा मिळाल्या. त्यात काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर समाधान मानावं लागलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.