AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचं बंड, औरंगाबादमधून अपक्ष लढणार

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलं आहे. काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने, आमदार अब्दुल सत्तार नाराज होते. अखेर त्यांनी आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन, अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. आमदार अब्दुल सत्तार हे काँग्रेसच्या […]

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचं बंड, औरंगाबादमधून अपक्ष लढणार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलं आहे. काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने, आमदार अब्दुल सत्तार नाराज होते. अखेर त्यांनी आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन, अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.

आमदार अब्दुल सत्तार हे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा उद्या (25 मार्च) राजीनामा देणार आहेत. तसेच, त्यांनी आमदारकीचा याआधीच राजीनामा दिला आहे. तो अद्याप मंजूर झालेला नाही. मात्र, औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले आहे.

याच सर्व पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीमुळे आणखी चर्चांना उधाण आले. मात्र, पाठिंबा मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, सर्वपक्षियांना पाठिंबासाठी भेटणार आहे, असे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिले.

आपण भाजपात जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनीही तशी ऑफर दिली नाही, असेही अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले.

अशोक चव्हाणांबाबत बोलताना, अब्दुल सत्तार म्हणाले, “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिल्लीत विश्वासात घेतलं जात नाही. अशोक चव्हाणच हतबल आहेत.”

अशोक चव्हाण काय म्हणाले?

“अब्दुल सत्तार यांना हवे असल्यास त्यांनी उमेदवारी लढवावी. त्यांना कुठे पाहिजे तिथे उमेदवारी दिली असती. त्यांच्या उमेदवारीचा काही विषय नाही. अपक्ष काही लढायची गरज नाही.”, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.

कोण आहेत अब्दुल सत्तार?

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.