AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करू शकत नाही, पण…- दीपक केसरकर

दीपक केसरकर यांचं सूचक विधान...

शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करू शकत नाही, पण...- दीपक केसरकर
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 03, 2022 | 3:02 PM
Share

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यासंदर्भात निर्णय केंद्र सरकारने घेईल. महाराष्ट्राच्या जनतेची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे कळवली आहे. झालेलं वक्तव्य मागे घेण्याबाबतच्या बाबतचं विधान यायला हवं होतं. शिवाजी महाराजांचा अपमान ही भूमी सहन करू शकत नाही. पण केंद्र सरकार लवकरच याबाबतचा निर्णय घेईल, असं राज्याचे शिक्षण मंत्री तसंच कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट शिवरायांशी करण्यात आली. त्यानंतर शिवभक्त आक्रमक झाले. खासदार उदयनराजे भोसलेही आक्रमक भूमिका मांडत आहेत. लवकरच मुंबईच्या आझाद मैदानावर पुढचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने ही प्रतिक्रिया आली आहे.

‘उरलेल्या नेत्यांची वाट पाहातोय’

जे लोक ठाकरेगटात राहिले आहेत त्यांना लवकरच कळेल आपली चूक झाली आहे. शिवसेना संपवायच्या कटकारस्थानाला उद्धव ठाकरे बळी पडले. आम्ही जनतेशी वफादार आहोत, तुम्ही मला काय म्हणता याकडे आम्ही लक्ष देत नाही. मागे राहिलेले लोक लवकरच चूक सुधारतील अशी अपेक्षा आहे आम्ही त्यांची वाट पाहतोय, असं केसरकर म्हणालेत.

पैशाने माणसं विकत घेतली जात असते तर उद्योगपती नेते झाले असते. माणसं प्रेमाने जिंकता येतात. तुम्ही आमदारांना कधी भेटला नाहीत त्यांना घराबाहेर उभं केलं, असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.

कर्नाटक सीमावादावरही केसरकर बोललेत. कर्नाटकने अविचाराने एखादा निर्णय घेतला तर तसा निर्णय आपणही घ्यायला पाहिजे असं नाही. त्यांच्या लोकांना आम्ही मुंबईमध्ये बंदी घालू शकतो पण तसे आम्ही करणार नाही, असंही केसरकर म्हणालेत.

Follow Us
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?