AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता असताना सुप्रिया ताई स्वतःशी संवाद साधायच्या, मुख्यमंत्र्यांचा टोला

सत्ता होती तेव्हा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई स्वतःशी संवाद करायच्या, त्यावेळीच जनतेशी संवाद केला असता तर ही वेळ आली नसती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंवर शरसंधान साधलं.

सत्ता असताना सुप्रिया ताई स्वतःशी संवाद साधायच्या, मुख्यमंत्र्यांचा टोला
| Edited By: | Updated on: Aug 27, 2019 | 12:05 PM
Share

बीड : विरोधी पक्षांच्या यात्रांना फारशी गर्दी जमत नाही, त्यामुळे त्यांना मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) सत्ता असताना जनतेशी संवाद साधला असता, तर ही वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बीडमध्ये महाजनादेश यात्रा सुरु आहे, त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विरोधी पक्षांच्या यात्रांना फारशी गर्दी जमत नाही, त्यामुळे त्यांना मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत. सत्ता होती तेव्हा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई स्वतःशी संवाद करायच्या, त्यावेळीच जनतेशी संवाद केला असता तर ही वेळ आली नसती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंवरही शरसंधान साधलं. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये वाक्-युद्ध रंगलं आहे.

ज्यांनी लोकसभेत भाजपला विरोध केला, त्यांना बीडच्या जनतेने जागा दाखवली. पुढच्या टप्प्यात काँग्रेसचे काही आमदार आमच्या यात्रेचं स्वागत करणार आहेत. ते स्वागत आम्ही स्वीकारणार आहोत, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी 133 कोटी रुपयांचा निधी आपण दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

दुष्काळाच्या उपाययोजना आम्ही करत आहोत. मराठवाडा वॉटर ग्रीड ही एक महत्त्वाची योजना आहे, त्यामुळे दुष्काळावर मात करता येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीड जिल्हा वॉटर ग्रीडलाही आपण मान्यता दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

कोकणात वाहून जाणारं 167 टीएमसी पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यात सोडून मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करणार आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेतून काम झालं. यावर्षी जी काही पिकं दिसत आहेत ती या योजनेमुळेच, असंही फडणवीसांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :
माझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज
भाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला

Follow Us
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.