AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटेचा शपथविधी; जयंत पाटील याचं ‘ते’ वक्तव्य, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया काय?

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात आले असताना माध्यम प्रतिनिधींनी त्यांना यावर प्रतिक्रिया विचारली.

पहाटेचा शपथविधी; जयंत पाटील याचं 'ते' वक्तव्य, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया काय?
देवेंद्र फडणवीस Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 26, 2023 | 6:35 PM
Share

मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोघांच्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचाच हात होता, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. जयंत पाटील यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर आज खुलासा केला. मला असं म्हणायचं नव्हतं, पण ज्या राजकीय घडामोडी घडल्या, त्यासाठी हेदेखील कारण असू शकतं, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यावर बोलणं टाळलं..

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात आले असताना माध्यम प्रतिनिधींनी त्यांना यावर प्रतिक्रिया विचारली. मात्र आज प्रजासत्ताक दिन असल्याने कोणतंही राजकीय वक्तव्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

जयंत पाटील काल काय म्हणाले?

जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काल एक खळबळजनक वक्तव्य केलं. ते म्हणाले, ‘ 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. परंतु अल्पावधीतच हे सरकार कोसळलं.

अजित पवार हे त्यावेळी भाजपच्या खेळीला भुलले असतील, असं वाटत नाही. तेव्हा राष्ट्रपती राजवट होती. ती उठण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने खेळलेली ती खेळी असू शकते, असं वक्त्वय जयंत पाटील यांनी केलं. त्यामुळे त्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार होते का, अशी चर्चा राजकारणात सुरु आहे.

जयंत पाटील यांचा आजचा खुलासा काय?

या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी आज खुलासा केला. ते म्हणाले, ‘ माझा फक्त कयास आहे. त्या घटनेने हे घडलं असेल. पवार साहेब आम्हाला विचारून कधी पावलं टाकत नाहीत. आम्ही खूप ज्युनियर आहोत. तशी अपेक्षाही नाही.

पण त्यांनी एखादी गोष्ट केली तर त्या गोष्टीचा अर्थ कळण्यास बराच वेळ लागतो. पण त्या वेळचा घटनाक्रम बघितला तर त्याचा फायदा नवं सरकार लवकर येण्यास झाला. त्यामुळे पवार साहेबांनी ते जाणूनबुजून केलं, असं मी अजिबात बोललो नाही. पण त्या शपथविधीचे फायदे काय झाले, हे मी समजावून सांगत होतो, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...