AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : ‘विरोधकांची लाईन डेड, म्हणून त्यांना डेडलाईन हवी’ मंत्रिमंडळ विस्तारावरुन फडणवीसांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnvis : यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांनाही टोला लगावला.

Devendra Fadnavis : 'विरोधकांची लाईन डेड, म्हणून त्यांना डेडलाईन हवी' मंत्रिमंडळ विस्तारावरुन फडणवीसांचं प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस...Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 16, 2022 | 12:28 PM
Share

मुंबई : ‘विरोधकांची लाईन डेड झाली आहे म्हणून ते डेडलाईन मागतायत’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तारावरुन विचारण्यात आलेल्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप मंत्रिमंडळ (Eknath Shinde Devendra Fadnavis Government Cabinet Expansion) विस्तार केलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार कधीपर्यंत होणार, याची काही डेडलाईन असणार आहे का? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात असल्याची टीका केली जात होती. अशातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी टोला हाणलाय. पराभव समोर दिसत असल्यानं अजित पवारांकडून टीका करण्याचं काम सुरु आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावरुन सुरु असलेल्या कुजबूज आणि चर्चांवर उत्तर दिलंय. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. पालकमंत्रीही लवकरच जाहीर केले जातील, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांनाही टोला लगावला. त्यांना रोज सकाळी उठून तेच काम असतं, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला. विरोधकांचा जसंवाटतं, तशी कोणतीही अडचण नाही, असं स्पष्टीकरणही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं.

पाहा व्हिडीओ :

मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नामातरांचा महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय कायम ठेवण्यात आल्याचं यावेळी जाहीर करण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत नेमके कोणकोणते निर्णय झाले, त्यावर एक नजर टाकुयात…

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

  1. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर होणार
  2. उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केलं जाणार
  3. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण होणार
  4. एमएमआरडीएला 60 हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता.
  5. एमएमआरडीएला पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार

Follow Us
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली.
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा.
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.