निवडणूक आल्यानंतर ऊसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

| Updated on: Dec 19, 2021 | 7:58 AM

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी उडाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भाऊ-बहिण आमने सामने आले आहेत.

निवडणूक आल्यानंतर ऊसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे
Follow us on

बीड : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी उडाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भाऊ-बहिण आमने सामने आले आहेत. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाला नगरपंचायत निवडणूक लढवायला साधा उमेदवार मिळत नसल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांना मदत

पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कोणीच प्रयत्न केला नाही. आजही बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. 12 डिसेंबर 2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड महामंडळाची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र पाच वर्ष सत्ता असतानाही महामंडळाची निर्मिती करता आली नाही. या काळात महामंडळ दोनदा रद्द झाले. सत्ता गेल्यानंतरच ऊसतोड कामगारांची आठवण होते. जो जिल्हा सातत्याने दुष्काळ अनुभवत होता, त्या जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. मात्र अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. त्यांना 502 कोटी रुपयांची मदत मिळून दिल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

…तेव्हाच शिवाजी महाराज आठवतात

दरम्यान कर्नाटकात दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केले होते. यावरून देखील धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. कर्नाटकात आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, परंतु भाजपाचा एकही नेता याबद्दल बोलला नाही. यांना फक्त निवडणुका आल्या तेव्हाच महाराज आठवतात असा टोलाही यावेळी धनंजय मुंडे यांनी लगावला.

संबंधित बातम्या

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये; तेवढी त्यांची उंची नाही, गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार, कर्नाटकातील घटनेनंतर राष्ट्रवादीची घोषणा

‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच- देवेंद्र फडणवीस