AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : पातळी सोडून बोलू नका, 2019 मध्ये जनतेशीच धोका झाला नाहीतर..! मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

मुळात जनतेने शिवसेना-भाजप युतीकडे बघून कौल दिला होता. मात्र, 2019 मध्ये सरकार स्थापनेच्या प्रसंगी ना जनतेचा विचार झाला ना इतरांचा. त्यामुळे हे तीन पक्षाचे सरकार मुळात जनतेलाच नको होते. परंतू, राजकीय स्वार्थासाठी हे सर्व घडून आणले गेले. सध्याचे भाजप-सेनेचेच सरकार हे जनतेच्या मनातले आहे.

Eknath Shinde : पातळी सोडून बोलू नका, 2019 मध्ये जनतेशीच धोका झाला नाहीतर..! मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| Updated on: Sep 05, 2022 | 9:57 PM
Share

मुंबई :  (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यापासून त्यांच्यासह इतर आमदारांवर (Shivsena Party) शिवसेनेकडून टीकास्त्र सुरु आहे. आतापर्यंत खालच्या पातळीवर टीका करु नका अन्यथा आम्हापण पातळी सोडावी लागेल असा इशारा अनेकवेळा शिंदे गटानेही दिला आहे. यापुढे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजकीय भूकंप होईल असे एक विधान केले आहे. 2019 मध्ये (MVA) महाविकास आघाडी बनवल्याने केवळ जनतेलाच धोका नव्हता तर आमच्यासाठीही मोठा धोकाच होता असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट म्हटले नसले तरी त्यांचा रोष तोच होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बनवताना विचारात घेणे गरजेचे होते असे म्हणून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

बहुमताचा विचार होणे गरजेचे

मुळात जनतेने शिवसेना-भाजप युतीकडे बघून कौल दिला होता. मात्र, 2019 मध्ये सरकार स्थापनेच्या प्रसंगी ना जनतेचा विचार झाला ना इतरांचा. त्यामुळे हे तीन पक्षाचे सरकार मुळात जनतेलाच नको होते. परंतू, राजकीय स्वार्थासाठी हे सर्व घडून आणले गेले. सध्याचे भाजप-सेनेचेच सरकार हे जनतेच्या मनातले आहे. आणि तेच घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न होता असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

जनतेबरोबर आणखी कुणाला धोका..?

गेल्या काही दिवसांपासून जो-तो शिंदे सरकारवर आरोप करीत आहेत. मात्र, पातळी सोडून बोलून चुकीचे आहे. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2019 च्या निवडणूकीनंतरची स्थिती सांगितली आहे. महाविकास आघाडी सरकारची स्थापना होतना किमान जनतेने आपल्या कोणत्या मुद्द्यावर निवडून दिले आहे, याचा विचार होणे गरजेचे होते. मात्र, केवळ जनतेलाच धोका नाहीतर असे म्हणत पुढचे बोलण्याला मुख्यमंत्र्यांनी बगल दिली पण त्यांचा रोष आहे जनतेबरोबर शिवसेनेतील अनेकांच्या मनात नसताना मविआ चे सरकारची स्थापना झाली असाच होता.

बाळासाहेंबाच्या विचारांशीही प्रतारणा

2019 मध्ये जी महाविकास आघाडीचे सरकार झाले ते सर्वसामान्य जनतेला तर मान्य नव्हतेच पण हे सरकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रतारणा केल्यासारखे होते. याची जाणीव असतानाही केवळ सत्तेसाठी हे पाऊल उचलण्यात आले. उलट आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. मतदारांनी ज्यांना खऱ्या अर्थाने कौल दिला होता ते सरकार आज सत्तेत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.

Follow Us
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.