AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : एकनाथ शिदेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांनी तिन्ही पक्षांचा सत्तेचं समीकरण सांगितलं

Eknath Shinde Live News : आम्ही परत गेल्यावर आमच्या सहकाऱ्यांशी बोलू. इथली स्थिती पाहून काही ना काही मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

Sharad Pawar : एकनाथ शिदेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांनी तिन्ही पक्षांचा सत्तेचं समीकरण सांगितलं
ठाकरे सरकारसाठी पुढचे 24 तास वैऱ्याचे, शरद पवार दिल्ली सोडून मुंबईकडेImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 21, 2022 | 2:29 PM
Share

दिल्ली : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत नाराज एकनाथ शिंदेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिदेंना (Eknath Shinde Live News) मुख्यमंत्रीपद हवं आहे, असं विधान शरद पवार (Sharad Pawar on Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी तिन्ही पक्षांच्या सत्तेचं समीकरणही सांगितलं. ते दिल्ली बोलत होते. महाराष्ट्रात जे झालं ते जगाच्या समोर आहे, असं म्हणतानाच ही पूर्ण फसवणूक आहे, असा टोलाही पवारांनी लगावलाय. हा दुसऱ्यादा झालेला प्रकार असल्याचं शरद पवार म्हणालेत. आधीही आमचे आमदार हरयाणात ठवले होते, असं शरद पवार यावेळी सांगायला विसरले नाहीत. अडीच वर्षे सरकार नीट चाललं, तसंच राष्ट्रवादीचं एकही मत इकडे तिकडे गेलं नाही, असंही पवार यांनी बोलताना स्पष्ट केलंय..

विधान परिषदेत झालेल्या मतदानामुळे आमच्यात कोणी नाराज नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं. आमच्या मित्रपक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकला नाही. आम्ही परत गेल्यावर आमच्या सहकाऱ्यांशी बोलू. इथली स्थिती पाहून काही ना काही मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनायचंय?

दरम्यान, मुख्यमंत्रीपदावर बोलताना शरद पवारांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय. कोण बोललं असेल मला मुख्यमंत्री बनवा, पण शिवसेनेकडेच मुंख्यमत्रीपदाची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मुख्यमंत्री बदलायचा असेल तर त्यांचा निर्णय आहे.

मात्र उद्धव ठाकरेंचं नेतृत्व बदलण्याची आम्हाला गरज वाटत नाही, असंही शरद पवारांनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. दुपारी ते त्यांच्या नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर त्यांच्याशी आम्ही बोलू. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असंही ते म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही तिघे सोबत आहे. पण एक्झॅटली काय मुद्दा आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे शिवसेनेकडून कळवलं जात नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असंही ते म्हणालेत.

पाहा व्हिडीओ :

शरद पवार हे सध्या दिल्लीमध्ये असून महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. एकीकडे एकनाथ शिंदे नाराज आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेकडून बैठकाही घेतल्या जात आहेत.

सध्याचं सत्तेचं समीकरण काय?

  1. शिवसेना 55
  2. राष्ट्रवादी 53
  3. काँग्रेस 44
  4. अपक्ष+इतर 17
  5. भाजप 106

शिवसेनेच्या 35 आमदारांनी बंड केल्यास मविआ अल्पमतात येणार आहे. एकनाथ शिंदेंसोबत मविआने बंडखोरी केल्या संख्याबळ 134 होईल आणि सरकार पडेल.

नाराज एकनाथ शिंदेंच्या यांच्याशी निगडीत ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?
नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?.
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान.
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ.
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे.
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!.
दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक
दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक.
ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं 'रोखठोक'
ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं 'रोखठोक'.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांचं विमान टेकऑफवेळी डगमगलं
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांचं विमान टेकऑफवेळी डगमगलं.
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.