NCP : एकनाथ शिंदेंच्या बंडात छेद कधी होणार? जयंत पाटलांनी तो क्षण नेमका सांगितला

Jayant Patil on Eknath Shinde : महाविकास आघाडीत शिवसेनेनं राहून नये, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे गटाने घेतलीय.

NCP : एकनाथ शिंदेंच्या बंडात छेद कधी होणार? जयंत पाटलांनी तो क्षण नेमका सांगितला
काय म्हणाले नेमकं पाटील?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 12:57 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक (NCP Meeting) पार पडली. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीत शरद पवारांच्या (Sharad Pawar on Mahavikas Aghadi) अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण खुलासे केलेत. महाविकास आघाडी सरकार पडू नये, यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रावादी काँग्रेस पूर्णपणे मदत करणार आहेत, असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde News) बंडाची कारणं आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादाची आम्हाला माहिती नाही, असं ही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, बंडखोरी केलेले आमदार आज ना उद्या परततीलच. शिवसेना आमदार परतले की चित्र अधिक स्पष्ट होईल. त्यानंतरही आम्ही शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं त्यांनी नमूद केलंय. गेलेले आमदार परत येतील, असा विश्वास आम्हाला आजही वाटतोय. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जी साद घातली आहे, त्याला सकारात्मक प्रतिसाद सर्व आमदार देतील, अशी खात्री आम्हाला वाटतेय, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

बंड कसं शमेल?

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे प्रचंड नुकसान झाल्याचा आरोप केलाय. शिवसेनेचं खच्चीकरण आणि शिवसेनेचं नुकसान महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमुळ झालं. या मित्रपक्षांनी आपला फायदा करुन घेतला. शिवसेनेला डाववलं, अशी भावना आमदारांमध्ये असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत शिवसेनेनं राहून नये, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलीय.

हे सुद्धा वाचा

टोकाची भूमिका घेतलेल्या एकनाथ शिंदे गटाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र असूनही आशेचा किरण दिसतोय. शिवसेनेचे गेलेले आमदार परतली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व स्वीकारतील, असं सांगितलं जातंय. मात्र दुसरीकडे सरकार आम्ही शेवटपर्यंत पडू देणार नाही, असाही विश्वास जयंत पाटील यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लढत राहू आणि उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारच आहोत, अशीही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केली. शरद पवार यांच्या घरी झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचं बंड शमवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रयत्न नेमके कितपत यशस्वी होतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वर्षावरुन मातोश्रीकडे

दरम्यान, मुख्मयंत्री वर्षावरुन मातोश्रीत परतले आहेत. यावरही जयंत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. आमच्या आग्रहासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षावर गेले होते. त्यांची मातोश्रीवरुन वर्षावर जाण्याची इच्छा पहिल्यापासूनच नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे. कामासाठी सोयीचं जावं म्हणून ते वर्षावर गेले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये रोखठोक बोलले. यानंतर त्यांनी थेट वर्षा बंगला सोडत मातोश्रीवर जाण्याचा निर्णय जाहीर केला. जाहीर केलेल्या निर्णयप्रमाणे ते रात्री उशिरा मातोश्रीवर परतलेही होते.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.