AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारसं करायला निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या नाहीये; उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं

गोवंश बंदी महाराष्ट्रात आहे. इतर राज्यात नाही. त्रिपुरातील भाजपचा प्रदेशाध्यक्ष गोमांस खातो. संघाचे होसबळे म्हणतात, गोमांस खाणाऱ्यांना दरवाजे बंद करता येणार नाहीत. मग तुमचं हिंदुत्व नेमकं आहे तरी कसं?

बारसं करायला निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या नाहीये; उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 26, 2023 | 8:48 AM
Share

मुंबई | 26 जुलै 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केली आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. आमचा पक्ष इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. उद्या मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचं नाव बदललं तर? निवडणूक आयोगाने शिवसेनेचं बारसं केलं नव्हतं. कानात येऊन नाव सांगायला निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या लागत नाहीये. ते नाव माझ्या आजोबांनी दिलंय. ते शिवसेना प्रमुखांनी घेतलं. म्हणून तर त्यांना शिवसेनाप्रमुख म्हणतात, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावलं.

कोणीही उठले आणि शिवसेनाप्रमुख व्हायला लागले तर लोक जोड्याने मारतील. आणि जेव्हा जोड्याने फिरतील तेव्हाच येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.

तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ

रामशास्त्री बाण्याचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात आहे. आमच्या बाजूनेच निकाल दिला तर त्यांचा बाणा सिद्ध होईल असं नाही. शिवसेनेने जे कोर्टात मांडलंय ते संविधानाला अनुसरून आहे. संविधानात जे लिहिलं ते पुसून टाकता येत नाही. संविधानाच्या तरतुदीला धरूनच आहे. नाही तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. घटना बदलावी लागेल, असं सांगतानाच आम्ही आता निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. उद्या विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी दरवाजे उघडे आहेत. आणि तिकडे सर्व सुनावणी झालेली आहे, असंही ते म्हणाले.

राज्याला विसरू नका

उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. अजित पवार अडीच वर्ष माझ्यासोबत होते. त्यांनी अर्थ खातं सांभाळलं. सत्तेच्या साठमारीत राज्याला विसरू नका हेच मी त्यांना सांगितलं, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यात हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. मग आरोप खरे की अजितदादा खरे? असा सवाल त्यांनी केला.

त्यांचं हिंदुत्व स्पष्ट करावं

मणिपूर हिंसेवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मणिपूर दिलीत चिनी ड्रॅगन शिरला आहे. गोमूत्र शिंपडल्यावर ते परत जातील का? हे हिंदुत्व नाहीये. देशाचं रक्षण करणं हे हिंदुत्व आहे, असं सांगतानाच देशभक्ती, राष्ट्रभक्ती, देशाचं संरक्षण हे माझं हिंदुत्व आहे. त्यांचं हिंदुत्व त्यांनी स्पष्ट करावं. त्यांच्या हिंदुत्वाला शेंडा बुडखा आहे काय? त्यांचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय?, असा सवाल त्यांनी केला.

मग त्यांच्यावर कारवाई का नाही?

गोवंश बंदी महाराष्ट्रात आहे. इतर राज्यात नाही. त्रिपुरातील भाजपचा प्रदेशाध्यक्ष गोमांस खातो. संघाचे होसबळे म्हणतात, गोमांस खाणाऱ्यांना दरवाजे बंद करता येणार नाहीत. मग तुमचं हिंदुत्व नेमकं आहे तरी कसं? एकीकडे तुम्ही गोवंश हत्याबंदी करता, दुसऱ्या ठिकाणी कोणाकडे गोमांस सापडलं तर संशयावरून मारून टाकता. मॉब लिचिंग होतं. दुसऱ्या राज्यात मात्र गोमांस खाऊ देता. भाजपचे नेतेच गोमांस खातो म्हणून सांगतात. मग त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असा सवाल त्यांनी केला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.