AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा, अजेंडाही सांगितला; काँग्रेसला टक्कर देणार?

जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा मला जे करणं शक्य होतं ते मी केलं. जे करणं शक्य नव्हतं ते मी दिल्लीच्या माध्यमातून केलं. माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी जम्मू-काश्मीरसाठी भरपूर काम केलं. डबल-ट्रिपल शिफ्टमध्ये मी काम केलं.

गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा, अजेंडाही सांगितला; काँग्रेसला टक्कर देणार?
गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा, अजेंडाही सांगितला; काँग्रेसला टक्कर देणार? Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2022 | 3:18 PM
Share

श्रीनगर: काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. माझ्या पक्षाचं नाव हिंदुस्तानी (hindustani) असेल. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ईसाई या सर्वांचा हा पक्ष असेल. काही लोक माझ्या पक्षाचं नाव जाहीर करत आहेत. ही चुकीची नावे आहेत. माझ्या पार्टीचं नावच काय, झेंडाही जम्मू-काश्मीरचे लोकच ठरवतील. माझ्या पक्षाचं नाव अमूक आहे आणि माझा झेंडा तमूक आहे, असं फरमान मी दिल्लीत बसून सोडणार नाही. माझ्याकडे बरीच नावे आली आहेत. त्यातील काही नावे उर्दू आहेत. तर काही संस्कृत आहेत. पण माझ्या पक्षाचं नाव हिंदुस्तानी असेल. हा पक्ष सर्वांचाच असेल, असं गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केलं आहे.

गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या अजेंड्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या विधानसभेत लेफ्टनंट गव्हर्नर नव्हे तर गव्हर्नर असेल. लोकांना त्याच्या जमिनी मिळाव्यात. जम्मू-काश्मीरच्या लोकांना रोजगार मिळावा. बिहारमधील कुणालाही जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी मिळू नये. तसेच काश्मिरी पंडितांचं काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन व्हावं हा माझा अजेंडा आहे, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.

रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. त्या बंद झाल्या पाहिजे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी माझ्याकडे भंडार आहे. जम्मू-काश्मीरच्या एका एका डोंगरात पर्यटन स्थळ निर्माण करून रोजगाराची निर्मिती करता येऊ शकते. जम्मू-काश्मिरातही पर्यटन स्थळ आहे. तिथपर्यंत रस्ते बनविण्याची गरज आहे. आज जेवढेही कार्यकर्ते आणि नेते इथे आले आहेत. ते मला विचारून आलेनाहीत. किंवा मला विचारून राजीनामा दिलेला नाही. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं. तेव्हा मी त्यांचे मनापासून आभार मानले. जम्मू-काश्मीरमधील तरुणांना रोजगार देणे आणि रोजगारांची निर्मिती करणे हाच आमचा अजेंडा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

जम्मू-काश्मीरसाठी खूप काही केलं

जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा मला जे करणं शक्य होतं ते मी केलं. जे करणं शक्य नव्हतं ते मी दिल्लीच्या माध्यमातून केलं. माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी जम्मू-काश्मीरसाठी भरपूर काम केलं. डबल-ट्रिपल शिफ्टमध्ये मी काम केलं. ट्युलिप गार्डन माझ्याच कार्यकाळात तयार झालं आहे. प्रवासी निवाज हज हाऊस आणि अनेक कामे मी केले याचा मला अभिमान आहे, असंही ते म्हणाले.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.