AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video| …तर राजकारण सोडेन, राऊतांनी निर्वाणीची भाषा का वापरली?

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

Video| ...तर राजकारण सोडेन, राऊतांनी निर्वाणीची भाषा का वापरली?
संजय राऊत
| Updated on: Feb 15, 2022 | 5:14 PM
Share

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद (Press conference) घेत भाजपावर (BJP) जोरदार हल्ला चढवला आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर सातत्याने भ्रष्टचाराचे आरोप होत आहेत. तसेच काही जणांची तर इडीकडून चौकशीला देखील सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी बोलताना राऊत यांनी म्हटले आहे की, दलाल ज्याला आपण भXX म्हणतो. त्यानं म्हटलंय की ठाकरे कुटुंबीयांनी कोर्लाई गावात 19 बंगले बांधून ठेवले आहेत. ही बेनामी प्रॉपर्टी आहे. माझे त्या माणसाला आव्हान आहे की, आपण त्या 19 बंगल्यावर पिकनिकला जाऊ जर तुम्हाला ते बंगले तिथे दिसते तर मी राजकारण सोडेल. आणि ते बंगले तिथे नसले तर तुम्हील त्या दलाला जोड्याने मारा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी नेमके काय म्हटले?

संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दलाल ज्याला आपण भXX म्हणतो. त्याने ठाकरे कुटुंबीयांवर आरोप केला आहे की, कोर्लाई गावात ठाकरे कुटुबींयांनी 19 बंगले बांधून ठेवले आहेत. ही बेनामी प्रॉपर्टी आहे. माझं आव्हान आहे की,  कधीही सांगा आपण चार बस करून संबंधित ठिकाणी पिकनिकसाठी जाऊ. तिथे जर 19 बंगले दिसले तर मी राजकारण सोडतो आणि तिथे जर बंगले नसले तर त्या दलालाल जोड्याने मारा. म्हणजे पुढच्यावेळी दिशाभूल करण्याची हिंमत होणार नाही. किरीट सोमय्या यांचे नाव न घेता संजय राऊत यांनी सोमय्यांना जोरदा टोला लगावला आहे.

‘मराठी भाषेच्या विरोधात कोर्टत गेले ‘

दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मराठी भाषेवरून देखील किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. हा भxx मराठी भाषेच्या विरोधात कोर्टात गेला. शाळेतील अभ्यासक्रमात मराठी भाष सक्तीची नको अशी मागणी त्याने कोर्टात केली होती. त्याचे थोबड आधी बंद करा नाही तर आम्ही करू असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवरून राऊत यांनी सोमय्या आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

संबंधित बातम्या

Sanjay Raut Press Conference : पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी सोमय्यांचे थेट संबंध, राऊत म्हणाले, पुराव्यानिशी सांगतोय, पूर्ण क्रोनोलॉजी सांगितली

Sanjay Raut: किरीट आणि निल सोमय्यांना अटक करा, राऊतांची मागणी, नेमके आरोप काय?

ठाकरे सरकार पाडण्यासाठी नेमकं कोण भेटलं? कोण ‘टाईट’ करतंय? पहिल्यांदाच राऊतांनी फोडून सांगितलं?

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.