AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील

एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत मोठी भूमिका घेतली आहे.

... तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 14, 2020 | 6:20 PM
Share

औरंगाबाद : एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत मोठी भूमिका घेतली आहे (Imtiyaz Jaleel on renaming Aurangabad as Sambhajinagar). त्यांनी मनसे आणि शिवसेनेला आधी शहराच्या विकासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. आधी पुढील 4 वर्षात शहराचा विकास करा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्या. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ.”

इम्तियाज जलील म्हणाले, “औरंगाबादमधील लोकांना, इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा नाव बदलायचं की विकास करायचा. संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. मात्र, त्यांनी आधी पुढील 4 वर्षांमध्ये शहराचा विकास करावा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्यावा. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ. तुम्ही जर कचरामुक्त शहर केलं, तर मी स्वत: संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन. फक्त नाव बदलून तुम्ही काय साध्य करणार आहात?”

मी 32 वर्षांपासून ऐकत आहे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर होणार आहे. निवडणुका जशा जशा येतात तसे हे मुद्दे उपस्थित केले जातात. आता महानगर पालिकेची निवडणूक येत आहे. त्यामुळेच नामांतराची पुन्हा मागणी होणार हे 200 टक्के माहिती होतं. कचरा, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे आहेत, पण यावर तुम्ही बोलणार नाही. ज्यांना काही कामं उरली नाहीत तेच असे मुद्दे उपस्थित करतात, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

“हा लोकांमध्ये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न”

इम्तियाज जलील म्हणाले, “शहराचं नाव बदलण्याची मागणी लोकांमध्ये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बाळासाहेब ठाकरे असते, तर ते माझ्या नावानं स्मारक बांधू नका, तर मोठं हॉस्पिटल बांधा, असं म्हणाले असते. भावनिक मुद्दे तयार करुन हे राजकारण करत आहेत. खैरेंना काही काम उरलेलं नाही. म्हणून ते हे मुद्दे पुढे करत आहेत. तुमच्या हातात सत्ता आहे. त्यामुळं तुम्हाला जे करायचे ते करा.”

संबंधित व्हिडीओ :

Imtiyaz Jaleel on renaming Aurangabad as Sambhajinagar

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....