AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील

एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत मोठी भूमिका घेतली आहे.

... तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील
| Updated on: Feb 14, 2020 | 6:20 PM
Share

औरंगाबाद : एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत मोठी भूमिका घेतली आहे (Imtiyaz Jaleel on renaming Aurangabad as Sambhajinagar). त्यांनी मनसे आणि शिवसेनेला आधी शहराच्या विकासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. आधी पुढील 4 वर्षात शहराचा विकास करा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्या. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ.”

इम्तियाज जलील म्हणाले, “औरंगाबादमधील लोकांना, इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा नाव बदलायचं की विकास करायचा. संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. मात्र, त्यांनी आधी पुढील 4 वर्षांमध्ये शहराचा विकास करावा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्यावा. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ. तुम्ही जर कचरामुक्त शहर केलं, तर मी स्वत: संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन. फक्त नाव बदलून तुम्ही काय साध्य करणार आहात?”

मी 32 वर्षांपासून ऐकत आहे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर होणार आहे. निवडणुका जशा जशा येतात तसे हे मुद्दे उपस्थित केले जातात. आता महानगर पालिकेची निवडणूक येत आहे. त्यामुळेच नामांतराची पुन्हा मागणी होणार हे 200 टक्के माहिती होतं. कचरा, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे आहेत, पण यावर तुम्ही बोलणार नाही. ज्यांना काही कामं उरली नाहीत तेच असे मुद्दे उपस्थित करतात, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

“हा लोकांमध्ये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न”

इम्तियाज जलील म्हणाले, “शहराचं नाव बदलण्याची मागणी लोकांमध्ये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बाळासाहेब ठाकरे असते, तर ते माझ्या नावानं स्मारक बांधू नका, तर मोठं हॉस्पिटल बांधा, असं म्हणाले असते. भावनिक मुद्दे तयार करुन हे राजकारण करत आहेत. खैरेंना काही काम उरलेलं नाही. म्हणून ते हे मुद्दे पुढे करत आहेत. तुमच्या हातात सत्ता आहे. त्यामुळं तुम्हाला जे करायचे ते करा.”

संबंधित व्हिडीओ :

Imtiyaz Jaleel on renaming Aurangabad as Sambhajinagar

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.