AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार राम मंदिराच्या भूमीपूजनावर ‘त्या’ अनुषंगाने बोलले, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावरुन केंद्र सरकारला टोला लगावला होता. त्यांच्या टीकेवर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. (Jayant Patil explain mean of Sharad Pawar statement about ram mandir stone foundation)

शरद पवार राम मंदिराच्या भूमीपूजनावर 'त्या' अनुषंगाने बोलले, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण
| Edited By: | Updated on: Aug 04, 2020 | 5:12 PM
Share

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मात्र, या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेवर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं (Jayant Patil explain mean of Sharad Pawar statement about ram mandir stone foundation).

“अलिकडे व्हाट्स अ‍ॅपवर एक मेसेज फिरत आहे. कोरोना संकट काळात माणूसच माणसाच्या मदतीला धावत आहे, देव उपयोगी पडताना दिसत नाही. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर हेच खरे देव आणि देवदूत आहेत, हे सिद्ध झालं आहे. देवाचा कुठेच पत्ता नाही, असं त्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. त्याचअनुषंगाने शरद पवार यांचं विधान आहे”, असं जयंत पाटील म्हणाले (Jayant Patil explain mean of Sharad Pawar statement about ram mandir stone foundation).

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“केंद्र सरकार राम भक्तांकडून पैसे घेऊन अयोध्येत राम मंदिर बांधत आहे. मंदिराच्या बांधकामासाठी सरकारी पैसा वापरला जाणार नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही”, असंदेखील जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार काल (19 जुलै) सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावला. “कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे. काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य आणि केंद्र सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील”, असं शरद पवार म्हणाले होते.

‘गोपीचंद पडळकरांची फोनवर प्रतिक्रिया घेऊ’, जयंत पाटलांचं आश्वासन

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (20 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सांगलीत आठ दिवस कडकडीत लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही उशीर होऊ नये म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेत आहोत. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची आम्ही फोनवर प्रतिक्रिया घेऊ”, असं जयंत पाटील म्हणाले.

संंबंधित बातम्या :

शरद पवारांचं विधान मोदींविरोधी नव्हे तर श्रीरामांविरोधात, पवार तर रामद्रोही : उमा भारती

उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? संजय राऊत म्हणतात…

सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही, सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने दौरा : शरद पवार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.