AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कोश्यारींची वक्तव्य, सीमाप्रश्न या मुख्यमंत्री बोलत नाहीत, महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच नव्हती”

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीय...

कोश्यारींची वक्तव्य, सीमाप्रश्न या मुख्यमंत्री बोलत नाहीत, महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच नव्हती
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 15, 2022 | 2:40 PM
Share

सांगली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर मागच्या बऱ्याच दिवसापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय. महापुरुषांच्या अवमानाविरोधात 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने विरोधक आक्रमक झालेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) टीका केलीय.

राज्यपाल कोशारी यांनी जी वक्तव्य केली, महापुरुषांच्या बरोबर अनुद्गार काढण्यात काम करणाऱ्याचा निषेध महामोर्चातून केला जाणार आहे. राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र यावर मुख्यमंत्री मुख्यमंत्री बोलत नाही. कोश्यारींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ आहे. सीमाप्रश्नाबाबतही ते बोलत नाहीत. सगळ्याच प्रश्नावर राज्य सरकारला अपयश आलंय. आधी महाराष्ट्राची अशी झालं नव्हतं, असं जयंत पाटील म्हणालेत.

मोर्चासाठी राज्य सरकारला परवानगी द्यावीच लागेल. परवानगी न देण्याचा वेडेपणा राज्य सरकार करणार नाही.परवानगीसाठी चर्चा सुरू आहेत. आता मोर्चा थांबणार नाही. मुंबई पुणे ठाणे पालघर रत्नागिरी पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोर्चासाठी येणार आहेत. राज्यपालांनी राज्यपाल झाल्यापासून कोणती चांगली गोष्ट केली आहे. यावर चर्चा होऊ शकते.पण आम्ही सगळं सहन केलंय. पण महापुरुषांचं आवमान होतो तेव्हा मी गप्प कसं बसणार? आम्ही आवाज उठवणारच, असं जयंत पाटील म्हणालेत.

भाजपच्या नेत्यांनी सांगितलेलेच निर्णय राज्यपालांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार ही एकच गोष्ट राज्यपालांना माहीत नव्हती. बाकी सगळ्या गोष्टी सांगून सुरू आहेत, असंही पाटील म्हणालेत.

Follow Us
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....