AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कोश्यारींची वक्तव्य, सीमाप्रश्न या मुख्यमंत्री बोलत नाहीत, महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच नव्हती”

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीय...

कोश्यारींची वक्तव्य, सीमाप्रश्न या मुख्यमंत्री बोलत नाहीत, महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच नव्हती
| Updated on: Dec 15, 2022 | 2:40 PM
Share

सांगली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर मागच्या बऱ्याच दिवसापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय. महापुरुषांच्या अवमानाविरोधात 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने विरोधक आक्रमक झालेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) टीका केलीय.

राज्यपाल कोशारी यांनी जी वक्तव्य केली, महापुरुषांच्या बरोबर अनुद्गार काढण्यात काम करणाऱ्याचा निषेध महामोर्चातून केला जाणार आहे. राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र यावर मुख्यमंत्री मुख्यमंत्री बोलत नाही. कोश्यारींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ आहे. सीमाप्रश्नाबाबतही ते बोलत नाहीत. सगळ्याच प्रश्नावर राज्य सरकारला अपयश आलंय. आधी महाराष्ट्राची अशी झालं नव्हतं, असं जयंत पाटील म्हणालेत.

मोर्चासाठी राज्य सरकारला परवानगी द्यावीच लागेल. परवानगी न देण्याचा वेडेपणा राज्य सरकार करणार नाही.परवानगीसाठी चर्चा सुरू आहेत. आता मोर्चा थांबणार नाही. मुंबई पुणे ठाणे पालघर रत्नागिरी पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोर्चासाठी येणार आहेत. राज्यपालांनी राज्यपाल झाल्यापासून कोणती चांगली गोष्ट केली आहे. यावर चर्चा होऊ शकते.पण आम्ही सगळं सहन केलंय. पण महापुरुषांचं आवमान होतो तेव्हा मी गप्प कसं बसणार? आम्ही आवाज उठवणारच, असं जयंत पाटील म्हणालेत.

भाजपच्या नेत्यांनी सांगितलेलेच निर्णय राज्यपालांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार ही एकच गोष्ट राज्यपालांना माहीत नव्हती. बाकी सगळ्या गोष्टी सांगून सुरू आहेत, असंही पाटील म्हणालेत.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.