AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहन भागवत म्हणतात ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे; जयंत पाटील म्हणतात ही तर स्टॅटजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांंनी टीका आहे.

मोहन भागवत म्हणतात ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे; जयंत पाटील म्हणतात ही तर स्टॅटजी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2022 | 3:11 PM
Share

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या वक्तव्यावर राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांंनी टीका आहे. आपल्या पूर्वजांकडून राष्ट्रीय पाप झालं आहे, एका समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे असं भागवत यांनी म्हटलं होतं. मोहन भागवत यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुका आल्या की वेगवेगळ्या समाजाबद्दल बोललं जातं. समाजाबद्दल बोलून निवडणुकीचा हेतू साध्य केला जातो असं पाटील यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटल?

जयंत पाटील यांनी मोहन भागवतांना त्यांच्या वक्तव्यावरून टोला लगावला आहे. निवडणुका आल्या की वेगवेगळ्या समाजाबद्दल बोललं जातं. समाजाबद्दल बोलून निवडणुकीचा हेतू साध्य केला जातो. निवडणुका जवळ आल्या की असे काही व्यक्तव्य करुन विशिष्ट वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न होतो. अशी काही लोकांची स्टॅटजी असते. या गोष्टी लक्षात घेतल्या तर मला वाटतं येत्या काळात मोहन भागवत साहेब विशिष्ट वर्गाला विश्वासात घेण्याच्या दृष्टीने काही पावलं भाजपाला सूचवतील आणि यातून ते आता जे काही भाषण करत आहेत त्याचे नक्कीच कृतीत रुपांतर होईल. असं पाटील यांनी म्हटलं आहे.

ब्राह्मण महासंघ आक्रमक

मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ देखील आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पापक्षालन करण्याची गरज ब्राह्मणांना नव्हे तर मोहन भागवत यांना आहे असं दवे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.