AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहन भागवत म्हणतात ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे; जयंत पाटील म्हणतात ही तर स्टॅटजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांंनी टीका आहे.

मोहन भागवत म्हणतात ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे; जयंत पाटील म्हणतात ही तर स्टॅटजी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2022 | 3:11 PM
Share

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या वक्तव्यावर राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांंनी टीका आहे. आपल्या पूर्वजांकडून राष्ट्रीय पाप झालं आहे, एका समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे असं भागवत यांनी म्हटलं होतं. मोहन भागवत यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुका आल्या की वेगवेगळ्या समाजाबद्दल बोललं जातं. समाजाबद्दल बोलून निवडणुकीचा हेतू साध्य केला जातो असं पाटील यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटल?

जयंत पाटील यांनी मोहन भागवतांना त्यांच्या वक्तव्यावरून टोला लगावला आहे. निवडणुका आल्या की वेगवेगळ्या समाजाबद्दल बोललं जातं. समाजाबद्दल बोलून निवडणुकीचा हेतू साध्य केला जातो. निवडणुका जवळ आल्या की असे काही व्यक्तव्य करुन विशिष्ट वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न होतो. अशी काही लोकांची स्टॅटजी असते. या गोष्टी लक्षात घेतल्या तर मला वाटतं येत्या काळात मोहन भागवत साहेब विशिष्ट वर्गाला विश्वासात घेण्याच्या दृष्टीने काही पावलं भाजपाला सूचवतील आणि यातून ते आता जे काही भाषण करत आहेत त्याचे नक्कीच कृतीत रुपांतर होईल. असं पाटील यांनी म्हटलं आहे.

ब्राह्मण महासंघ आक्रमक

मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ देखील आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पापक्षालन करण्याची गरज ब्राह्मणांना नव्हे तर मोहन भागवत यांना आहे असं दवे यांनी म्हटलं आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...