AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शपथविधीपूर्वीच एनडीएत नाराजी, जेडीयू सरकारमधून बाहेर

नवी दिल्ली : एनडीएचं सरकार दुसऱ्यांदा स्थापन होतंय. पण सरकारमध्ये बिहारमधील पक्ष जेडीयू सहभागी होणार नाही. मोदी कॅबिनेटमध्ये दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल, अशी जेडीयूला अपेक्षा होती. पण भाजपने ही मागणी फेटाळली आहे. 16 जागा असलेल्या जेडीयूने सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतलाय. पण जेडीयू एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून कायम असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, आरसीपी सिंह […]

शपथविधीपूर्वीच एनडीएत नाराजी, जेडीयू सरकारमधून बाहेर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 30, 2019 | 6:37 PM
Share

नवी दिल्ली : एनडीएचं सरकार दुसऱ्यांदा स्थापन होतंय. पण सरकारमध्ये बिहारमधील पक्ष जेडीयू सहभागी होणार नाही. मोदी कॅबिनेटमध्ये दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल, अशी जेडीयूला अपेक्षा होती. पण भाजपने ही मागणी फेटाळली आहे. 16 जागा असलेल्या जेडीयूने सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतलाय. पण जेडीयू एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून कायम असेल.

सूत्रांच्या माहितीनुसार, आरसीपी सिंह आणि लल्लन सिंह यांना केंद्रीय मंत्री बनवलं जावं, अशी जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांची मागणी होती. तर संतोष कुशवाह यांच्यासाठी राज्यमंत्रिपद मागितलं होतं. पुढच्या वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिपदाच्या माध्यमातून नितीश कुमार जातीय समीकरणंही साधत होते. पण ही मागणी अमान्य करण्यात आली.

आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती जेडीयू नेते बशिष्ठ नारायण सिंह यांनी दिली. शिवाय एनडीएमध्ये राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

प्रत्येक मित्रपक्षाकडून एक एक मंत्री बनवला जाईल, असं बोललं जातंय. शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत शपथ घेणार आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय. अकाली दलकडून हरसिमरत कौर पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. लोक जनशक्ती पक्षाकडून रामविलास पासवान, आरपीआयकडून रामदास आठवले, एआयडीएमकेकडून माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचे चिरंजीव रवींद्रनाथ आणि अपना दलकडून अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपद मिळेल.

Follow Us
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...