AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, आनंद करमुसे मारहाण प्रकरण CBI कडे देण्याची मागणी फेटाळली

जितेंद्र आव्हाड हे सरकारमध्ये असल्यामुळे या प्रकरणाचा तपास नीट होणार नाही, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्या अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ती मागणी न्यायालयाने अमान्य केल्याने या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलीस हेच करणार आहेत.

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, आनंद करमुसे मारहाण प्रकरण CBI कडे देण्याची मागणी फेटाळली
जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाचा मोठा दिलासाImage Credit source: tv9
| Updated on: Apr 26, 2022 | 4:38 PM
Share

मुंबई : मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना आज एक मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आनंद करमुसे प्रकरण सीबीआयकडे (CBI) देण्याची मागणी ही हायकोर्टाने (Bombay High Court) फेटाळून लावली आहे. जितेंद्र आव्हाड हे सरकारमध्ये असल्यामुळे या प्रकरणाचा तपास नीट होणार नाही, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्या अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ती मागणी न्यायालयाने अमान्य केल्याने या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलीस हेच करणार आहेत. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या प्रकरणात मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटकही झाली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री आहेत. त्यामुळे तपासावर दबाव येऊ शकतो, असा आरोप करण्यात येत होता.

हे नेमकं प्रकरण काय?

त्यांनी सोशल मीडियावर एक आक्षापर्ह पोस्ट टाकल्यावरून आव्हाडांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात दिवे लावण्याचे आव्हान केले होते, त्यावर केलेल्या टीकेवरून हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना त्यावेळी पोलिसांनी लवकर सोडल्याने मला न्याय मिळाला नाही, असाही आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी एका प्रकरणाच्या तपासासाठी म्हणून मला जितेंद्र आव्हाडांच्या घरी नेलं. आणि तिथं मला मारहाण करण्यात आली, असा आरोप आनंद करमुसे यांनी केला आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. यात आव्हाड यांना सर्वात जास्त शेवटी अटक केली, हे माझं दुर्दैव आहे, असेही ते त्या वेळी म्हणाले होते.

केंद्र आणि राज्याचा मोठा वादही तुर्तास टळला

राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या जशा धाडी सुरू आहेत. आणि इतर कारवाई सुरू आहेत. त्यावरून आधीच राजकारण जोरदार तापलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच आव्हाड यांचंही प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी झाल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता होती. मात्र हायकोर्टाने तुर्तास तरी या वादावर पडदा टाकल्याचे दिसून येते. आता या प्रकरणाचा तपसा मुंबई पोलीस हेच करतील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.