AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad on Ketaki Chitale : ‘ठेचून काढत नाही तोपर्यंत ही विषवल्ली वाढतच जाणार’, पवारांविरोधातील पोस्टचा जिंतेंद्र आव्हाडांकडून समाचार

'पवारांच्या आजाराबाबत, त्यांच्या शारिरिक स्थितीबाबत बोलणं, नरक मिळावा म्हणून प्रार्थना करणं हे एका स्त्रीला शोभा देत नाही', अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.

Jitendra Awhad on Ketaki Chitale : 'ठेचून काढत नाही तोपर्यंत ही विषवल्ली वाढतच जाणार', पवारांविरोधातील पोस्टचा जिंतेंद्र आव्हाडांकडून समाचार
जितेंद्र आव्हाड, केतकी चितळेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 3:54 PM
Share

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) फेसबुक पोस्टनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. पवार समर्थक, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून केतकी चितळेवर सडकून टीका होतेय. अशावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही केतकीच्या पोस्टचा चांगलाच समाचार घेतलाय. आव्हाड म्हणाले की राजकीय टीकेचा राजकीय मुकाबला होऊ शकतो. राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील हे देखील टीका करतात. त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. ही वैचारिक लढाई असते, ती आम्ही विचारानेच लढतो. मात्र, ‘पवारांच्या आजाराबाबत, त्यांच्या शारिरिक स्थितीबाबत बोलणं, नरक मिळावा म्हणून प्रार्थना करणं हे एका स्त्रीला शोभा देत नाही’, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.

पवारसाहेबांवर अनेकवेळा टीका झाली. तेव्हा आम्ही बोललो. मात्र शरद पवार यांच्या आजाराबाबत, त्यांच्या शारिरिक स्थितीबाबत बोलणं आणि नरक मिळावा अशी प्रार्थना करणं, हे एका स्त्रीला शोभण्यासारखं नाही. स्त्री ही मातेसमान असते. पवारांबाबत जे भयंकर लिहिलं आहे, ते शब्द तोंडातून निघतही नाहीत. असं का लिहावं वाटतं हा संशोधनाचा विषय आहे. इतिहासात भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांवरही टीका केली होती. आम्ही पहिल्याच फटक्यात गांभीर्यानं घेत नाही. लोक मला सांगत आहेत की कशाला गांभीर्यानं घेता. वयाच्या 83 व्या वर्षी मैदानात उतरणारा तुमचा बाप, त्याच्यावर चालून जाणारी विकृती कुणी असेल तर त्यांना रोखायला हवं. नाहीतर अशी वाढत जाणारी विषवल्ली जोपर्यंत ठेचून काढत नाही तोपर्यंत विषवल्ली वाढतच जाणार. त्यामुळे हे विष संपवलं नाही तर ते समाजाला संपवून टाकेल, असा सूचक इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.

केतकी चितळेची नेमकी फेसबुक पोस्ट काय?

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.