AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात ‘बंटी विरुद्ध मुन्ना’ वाद उफाळला, राजाराम साखर कारखान्याच्या सभेतच राडा

राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक यांचे समर्थक भिडल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

कोल्हापुरात 'बंटी विरुद्ध मुन्ना' वाद उफाळला, राजाराम साखर कारखान्याच्या सभेतच राडा
| Updated on: Sep 11, 2019 | 1:38 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापुरात महाडिक आणि पाटील गटातील वाद (Kolhapur Mahadik Vs Patil) पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत महादेवराव महाडिक (Mahadeo Mahadik) आणि सतेज पाटील (Satej Patil) यांचे गट आमनेसामने आले. भरसभेतच दोन गट भिडल्यामुळे (Kolhapur Mahadik Vs Patil) मोठा राडा झाला.

कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या भाजपवासी झालेले धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यातील वाद नवीन नाही. राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक यांचे समर्थक भिडल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सर्वसाधारण सभा सुरु असतानाच दोन्ही बाजूकडून आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तर पाटील गटाकडून भर सभेत पत्रकं भिरकावण्यात आली.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यंदा ऋतुराज पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची घोषणा सतेज पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली होती. महत्त्वाचं म्हणजे सतेज पाटील यांच्या या मेळाव्याला शिवसेना खासदार संजय मंडलिक (Shiv Sena MP Sanjay Mandlik) हे सुद्धा उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांच्या निर्णयास माझा पाठिंबा आहे, असं शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी यावेळी सांगितलं.

सतेज पाटलांची घोषणा, पुतण्या ऋतुराजला उमेदवारी, काँग्रेसच्या मेळाव्यात शिवसेना खासदार मंचावर

2014 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील हे कोल्हापूर दक्षिणमधून लढले होते. मात्र त्यावेळी त्यांचा भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाचा वचपा म्हणून सतेज पाटील यांनी अमल महाडिक यांचे चुलत बंधू धनंजय महाडिक यांच्याविरोधात लोकसभेला भूमिका घेतली. राष्ट्रवादीकडून लढलेल्या धनंजय महाडिक यांचा पराभव झाला. नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात हाय-टेन्शन मतदारसंघ म्हणून कोल्हापूर दक्षिण (Kolhapur South) या मतदार संघाकडे पाहिलं जातं. कारण याठिकाणी पारंपरिक शत्रू असलेले महाडिक गट आणि सतेज पाटील (Satej Patil) गट समोरासमोर असतील . 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी उमेदवारी दिलेले अमल महाडिक यांनी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव करत मोठा धक्का दिला होता.

भाजपमध्ये प्रवेश करुन अवघ्या काही दिवसात अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी चमत्कार करुन दाखवला होता. त्यातूनच महाडिक आणि पाटील गटाचं राजकीय शत्रूत्व शिगेला पोहोचलं. धनंजय महाडिक यांना 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मदत करुनदेखील विधानसभेला महाडिक यांनी धोका दिल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे. त्याचाच हिशेब सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत चुकता केला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा पराभव झाला.

आता पुन्हा दक्षिणमधून सतेज पाटील यांनी दंड धोपटले आहेत. त्यामुळं कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशी लढत होऊ शकते. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 2014 मध्ये आमदार अमल महाडिक यांना 1,05,489 मतं मिळाली होती. तर पराभूत सतेज पाटील यांना 96,961 मतं मिळाली होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.