AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : इथे माझा कंटाळा आलाय का..? शरद पवारांच्या उत्तरावर हशा..!

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपा सोडून सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. कोणीही विरोध दर्शवला नव्हता. एवढेच नाही तर निवडणुकीमध्ये रणनिती कशी राहणार हे देखील स्पष्ट झाले होते.

Sharad Pawar : इथे माझा कंटाळा आलाय का..? शरद पवारांच्या उत्तरावर हशा..!
खा. शरद पवारImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2022 | 5:39 PM
Share

औरंगाबाद : पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या अनुशंगाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (Sharad Pawar) शरद पवार हे (Aurangabad) औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. पक्षाचे कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एका वाक्यात अनेक अर्थ अशीच शरद पवार यांची पत्रकार परिषद असते पण औरंगाबादमध्ये खेळी-मेळीच्या वातावरणात त्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. (The President) राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला आपण नकार दिला अन्यथा, राष्ट्रपतीच्या रुपात तुम्हाला पाहता आले असते ? या प्रश्नावरील उत्तराने एकच हशा उमटला. का माझा इथे तुम्हाला कंटाळा आला का? ह्या एका वाक्यात त्यांनी राष्ट्रपती उमेदवारीबद्दल आपले मत व्यक्त केले. पण यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले.

म्हणून पवारांनी उमेदवारी नाकारली..

राष्ट्रपती पदासाठी भाजपा सोडून इतर सर्व पक्षांचा आग्रह होता. पण उद्या या निवडणुकीमध्ये यश आले असते तरी राष्ट्रपती पदाची मोठी जबाबदारी पडली असती. शिवाय माझा स्वभाव हा जनतेमध्ये जाण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आहे. तिथे मी एकाच जागी अडकून पडलो असते. ते काही माझ्या व्यक्तिमत्वाला शोभणारे नव्हते. त्यामुळे ज्या गावाला जायचेच नाही त्याची वाट कशाला विचारायची म्हणून आपण या निवडीतून माघार घेतल्याचे पवारांनी सांगितले आहे.

भाजपा सोडून सर्वांचा पाठिंबा

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपा सोडून सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. कोणीही विरोध दर्शवला नव्हता. एवढेच नाही तर निवडणुकीमध्ये रणनिती कशी राहणार हे देखील स्पष्ट झाले होते. शिवाय उमेदवारी स्वीकारली असती तर चित्र कदाचित वेगळे राहिले असते असे म्हणत त्यांनी निवडीबाबत विश्वासही असल्याचे सांगितले पण त्यामध्ये पडायचेच नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे पवार म्हणाले.

तर पक्षाकडे दुर्लक्ष झाले असते…

एकावेळी एकच काम चांगले होते. पक्ष संघटन, जनतेशी संवाद आणि निर्माण झालेल्या परस्थितीतून मार्ग काढणे हा माझा स्वभाव आहे. सध्या पक्ष संघटन यावरही लक्ष केंद्रीत आहे. अशा परस्थितीमध्ये राष्ट्रपती पदावर जाणे म्हणजे अडकून बसण्यासारखे झाले असते. तो आपला स्वभावच नाही. शिवाय मी दिल्लीमध्ये अडकून पडलो तर पक्षाकडे दुर्लक्ष झाले असते असेही मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.